प्रजासत्ताकदिनी ‘लोकशाही’ विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटूर येथे भेट घेऊन त्याचे कौतुक केले. रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक शिक्षण घेत आहे.
प्रजासत्ताकदिनी 'लोकशाही' विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी वाटूर येथे भेट घेऊन त्याचे कौतुक केले.याप्रसंगी कार्तिक याच्या लोकशाही विषयावरील भाषणाकरिता अभिनंदन करित त्याचे मनापासून कौतुक केले. या भेटीमध्ये कार्तिकला दूरदृष्टीचा दोष आहे असे त्याच्या वडिलांनी सांगितले.त्याच्या डोळ्यांवरील उपचाराची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामार्फत घेण्यात आल्याचे यासमयी जाहीर केले.तसेच लवकरात लवकर चिरंजीव कार्तिक याला ज्येष्ठ नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे नेत्र तपासणीसाठी मुंबईत आणण्यात येणार असून त्याच्यावर मुंबईतील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये उत्तमोत्तम उपचार करण्यात येणार असल्याचे देखील जाहीर केले. रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक शिक्षण घेत आहे. pic.twitter.com/4zEXAu1Oop
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 2, 2023
जालना : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेच्या कार्यक्रमात ‘लोकशाही’ (Lokshahi Speech by School Boy ) या विषयावर भाषण देणारा कार्तीक हा लहान मुलगा हिरो बनला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेलं चिमुकल्याचे भाषण ऐकून सगळेच जण त्याचे फॅन बनले आहे. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर हा मुलगा नेमका आहे तरी कोण, तो राहतो कुठे असे प्रश्न सगळ्यांनाचा पडले आहे. मात्र, लोकशाहीवर बिधास्त भाषण देऊन सगळ्यांना हसवणाऱ्या लहान मुलाची खरी कहाणी डोळ्यात पाणी आणणारी अशी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ”लोकशाही” विषयावर भाषण ठोकणारा त्या लहान मुलाचा अखेर शोध लागला आहे. कार्तिक जालिंदर वजीर असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात कार्तिक शिकत आहे. कार्तिक खूपच गोरा असल्यानं त्याला त्याचे मित्र आणि सगळी मुलं भूऱ्या म्हणून चिडवतात.
कार्तिकचे वडील शेतकरी असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. केवळ भाषणात त्याने सांगितल्याप्रमाणेच नाही तर मुळातच कार्तिक खूपच खोडकर आहे. व्हायरल झालेल्या भाषणाच्या व्हिडीओतून कार्तिकने सर्वांना आपलंसं केले आहे. मात्र, त्याच्या या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठा संघर्ष दडलेला आहे. त्या कार्तिकचे आज मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले तर माजी मंत्री राजेश टोपेंनीही त्याला आपल्या निवासस्थानी बोलावून त्याचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भुऱ्या उर्फ कार्तिक वजीर या माझ्या मतदारसंघातील विद्यार्थ्याला स्वतः घरी बोलवून या विद्यार्थ्याचे भाषण ऐकले व त्याचा सत्कार केल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्टिटकरुन सांगितले आहे.. pic.twitter.com/OUMSGXYMrF
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 31, 2023
कार्तिकचा शाळेतील ओरीजल व्हीडीओ