नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त शहरी नक्षलवादी संघटनाही सहभागी झाल्याचा दावा (CM Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. विधानसभेत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा दावा केला असून 15 नोव्हेंबर 2024 रोजी काठमांडू येथे झालेल्या बैठकीचा उल्लेख करून भारत जोडो यात्रेतील (Bharat Jodo Yatra) काही लोकही या बैठकीत सहभागी झाल्याचे सांगितले.
आपल्या देशात परकीय हस्तक्षेपाचे पुरावे संसदेत पोहोचल्याचा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला. 15 नोव्हेंबर 2024 रोजी काठमांडू येथे झालेली बैठक ही केवळ एक सामान्य बैठक नव्हती, तर महाराष्ट्र सरकारला कमकुवत करण्याच्या उद्देशाने एक धोरणात्मक अधिवेशन होते. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रेत 80 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत, त्यापैकी 40 गटांनी निवडणूक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि 48 आघाडी संघटना म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, काठमांडूची बैठक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या (ईव्हीएम) विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यावर केंद्रित होते. ज्यामध्ये निवडणूक निकालांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यावर आणि मतपत्रिका पुन्हा सुरू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी दिला हा ‘संदर्भ’
यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने 18 फेब्रुवारी 2014 रोजी लोकसभेत दिलेल्या निवेदनाचा हवाला दिला. या निवेदनात, 72 आघाडीच्या संघटनांची ओळख पटली. त्यापैकी 7 भारत जोडो मोहिमेशी थेट संबंधित होत्या आणि 13 नक्षलविरोधी कारवायांशी संबंधित होत्या. या खुलाशांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी प्रचार केलेल्या खोट्या आख्यायिका दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. त्यांनी महायुतीच्या विजयाचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आणि राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दाखला दिला.