नागपूर: सरकारमध्ये ४१ बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यावरून सरकारने अनोखा विक्रम केला आहे. विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सरकारबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी धक्कादायक माहिती दिली. विद्यमान सरकारने ४१ बिनखात्याचे मंत्री अधिवेशनकाळात काम करत असल्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. अगदी दोन उपमुख्यंत्रीसुद्धा बिनखात्याचे आहेत. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण कारभार चालवित आहेत. सरकारमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले की ते लोकशाहीला मारक असते. त्यामुळे सत्तापक्ष मुजोर बनतो. तसे चित्र सध्या दिसून येत आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.