धानोरा तालुक्यात नक्षल्यांनी केली दोघांची हत्या

0
13
file photo

गडचिरोली,दि.०२-जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात नक्षल्यानी दोघांची हत्या केल्याची घटना आज शनिवारला घडली.नक्षलवाद्यांनी गेल्या २५ जानेवारीपासून सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी (दि.२) पुन्हा धानोरा तालुक्यातील दोन निरपराध नागरिकांची हत्या करण्यात आली. गिरमा कुडयामी आणि समरू अशी मृतांची नावे आहेत.
हे दोघे काही दिवसांपासून गडचिरोलीत राहात असल्याची माहिती आहे. शुक्रवारी ते आपल्या गावी परतल्यानंतर नक्षल्यांनी त्यांना रात्री सोबत नेऊन पहाटे त्यांची हत्या केली. यापूर्वी २५ ते ३१ जानेवारीदरम्यान नक्षलवाद्यांनी प्रतिकार सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. यादरम्यान भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात ५ जणांची निर्घृण हत्या केली होती. आता पुन्हा दोन जणांची भर त्यात पडली. नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून सदर हत्या केल्या जात आहेत. परंतू नक्षली बळी घेत असलेले निरपराध नागरिक आमचे खबरी नाहीत, असे पोलीस सांगत आहेत.