तिरोडा,दि.२३ः- राज्य सरकारच्या नागपुर -गोंदिया समृद्धी महामार्गची घोषणा करण्यात आली.यामध्ये तालुक्यातील धादरी-उमरी येथील शेतजमिन जाणारे सर्व पीड़ित शेतक-यानी विविध मागण्याचे निवेदन डाॅ दिनदयाल पटले यांच्या नेतृत्वात उपविभागिय अधिकारी, तिरोडा यांना देत आपला आक्षेप नोंदवविला आहे.
नागपुर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृध्दी महामार्ग तयार होणार असून ग्राम पंचायत धादरी येथे दि. १९/०६/२०२४ ला भूमिअधिग्रहण होणा-या शेतजमिनिची यादी प्रकाशित करण्यात आली असून प्रकल्पग्रस्त शेतक-यांना आक्षेप किंवा तक्रार असल्यास 21 दिवसाच्या आत नोंदवण्याचे म्हटले आहे.या महामार्गामुळे धादरी-उमरी येथील शेतक-यांवर भुमीहीन होण्याची पाळी येणार आहे.समृध्दी महामार्गात जमीन जात असलेल्या शेतक-यांना कोणत्याची प्रकारची वैयक्तीक नोटीस मात्र देणे उपविभागीय अधिकारी यांनी टाळल्याने रोष दिसून येत आहे.
जमीनीचे भूमिअधिग्रहण करावयाचे असल्यास पिडीत प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेऊन जमीनीचे अधिग्रहण करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतक-यांच्यावतीने करण्यात आली आहे.तसेच निवेदनात प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे.प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतक-याच्या कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नौकरीमध्ये समावेश करण्यात यावे.नागपुर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृध्दी महामार्ग लगत शेतक-यांच्या/गावक-यांच्या उपयोगाकरीता दुतर्फा सर्विस रोड देण्यात यावे.शेतजमिन अधिग्रहन करतांनी सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेउन आजच्या नविन खरेदी किंमतीच्या पाच पट रक्कम देण्यात यावी.नागपुर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृध्दी महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भुमीहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरीता शेती योग्य शासकीय जमिन उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदन देतेवेळी डॉ.दिनदयालजी पटले, सुखदासजी अनकर, भाऊलालजी पटले, इंजि. कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, गौरव झरारिया, शरद भौत्तिक, अनिल अनकर, सुनील पटले, सतीश पटले सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.