समृद्धीमार्गाला घेत धादरी-उमरीवासियांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

0
635

तिरोडा,दि.१४ः नागपूर ते गोंदिया द्रूतगती (समृद्धी) मार्ग बांधकामाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या संदर्भात काही दिवसांपूर्वी अधिसुचना प्रसिध्द करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातून दु्तगती मार्ग जाणार आहे.तालुक्यातील ज्या गावातून हा महामार्ग जाणार तेथील शेतकèङ्मांच्या जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. या महामार्गाच्या बांधकाम करताना शेतकèयांसोबत अन्याय होऊ नये, शेतकèयांना विश्वासात घेवूनच महामार्गाचे काम व्हावे, याकरीता धादरी-उमरी येथील शेतकèयांनी तिरोडाच्या उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड यांना डॉ दिनदयाल पटले याच्या नेतृत्वात निवेदन देवून आपल्या समस्या व मागण्या शासनासमोर ठेवल्या आहेत.
समृध्दी महामार्गात शेतक-यांची जमीन जात असुन जात असलेल्या जमीनीबाबद शेतक-यांना कोणत्याची प्रकारची वैयक्तीक नोटीस मिळालेली नाही.आणि या अगोदर सर्व शेतक-यांनी दि.२७/०३/२०२४ ला व दि.२१/०६/२०२४ ला निवेदन दिले होते पण अजूनपर्यंत त्या अर्जावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.आणि शेतक-यांच्या जमीनीची भूमिअधिग्रहण करावयाचे असल्यास पिडीत प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेवुन जमीनीचे अधिग्रहण करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतक-यांनी केली आहे.
शेतकèयांना विश्वासात घेऊनच महामार्गाचे काम व्हावे, प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकèयांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, कुटूंबातील एका सदस्याला योग्यतेनुसार शासकीय नोकरीत समावेश करावा, गोंदिया-नागपूर समृध्दी महामार्ग लगत शेतकरी व गावकèयांच्या उपयोगाकरीता दुतर्फा सविर्स रस्ता तयार करावा, जमिन अधिग्रहण करताना आजच्या नविन खरेदी खताच्या पाच पट रक्कम द्यावी,जे शेतकरी भुमिहीन होणार त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी,आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
यावेळी डॉ.दिनदयालजी पटले, सुखदासजी अनकर, सुनील पटले, इंजि कुमुद पटले, मोरेश्वर अनकर, शरद भौत्तिक, अनिल अनकर,दिनदयालजी अनकर,गणेश पटले, सतीश पटले, महेंद्र कुत्राहे, घनश्याम रहांगडाले, पामराज कुत्राहे, शंकर कुत्राहे, प्रभूलाल कुत्राहे सह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.