सालेकसा दि.02 -येथील पंचायत समिती सभागृहात जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.सदर प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी उपस्थितांना गावात नियमित शुद्धीकरण करून जनतेस निर्जंतुक पाणीपुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.कार्यशाळेत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल,सालेकसा खंड विकास अधिकारी संजय पुरी , सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,पाणी गुणवत्ता विभागाचे विषय तज्ञ मुकेश त्रिपाठी सुद्धा उपस्थित होते.
डॉ.वानखेडे यांनी गावातील लोकांसोबतच शाळा,वस्तीगृह,आश्रमशाळा,यात्रे
जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल यांनी पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत पाण्याच्या दूषित संसगनि, कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाच्या पद्धतीची माहिती असने आवश्यक आहे.पाण्यात न विरघळणारे पदार्थ असतील, माती वा गढूळपणा असेल तर पाणी गाळून घ्यावे लागते. पाणी उकळणे हा एक खात्रीशीर उपाय आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर किमान १० मिनिटे उकळावे. उकळलेले पाणी थंड करत असतान त्यात तुरटी फिरवावी. यामुळे जिवाणू-विषाणू तर नष्ट होतातच पण क्षारांचे प्रमाणसुद्धा कमी होते.त्यामुळे मुतखड्यासारखे आजारही कमी होतात.पाणी शुद्धीकरण म्हणजे दूषित पाण्यातून अवांछित रसायने, जैविक पदार्थ, वायू आणि निलंबित घन पदार्थ काढून टाकणे. या प्रक्रियेमुळे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. पाणी शुद्धीकरणाच्या काही पद्धती आहेत त्यात पाण्यात तुरटी मिसळणे,पाणी उकळणे,पाण्यात ब्लीचचे थेंब टाकणे,पाण्यात क्लोरीन टाकणे ई. वापरण्यात येत असतात.
तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण कार्यशाळेत पाणी गुणवत्ता निरीक्षक,विस्तार अधिकारी,गट समन्वयक, ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक,जलसुरक्षक,ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.