हक्कासाठी एकच लक्ष्य ८ डिसेंबरचा ओबीसीं महामोर्चा-लाखनी साकोलीतील बैठकितील सुर

0
14

लाखनी/साकोली – संविधानाने देऊ केलेले अधिकार स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही ओबीसींना मिळालेले नाही.जेव्हा ओबीसींना न्याय देणारा बील संसदेत सादर करण्याची वेळ आली तेव्हा तत्कालीन सत्ताधार्यांनी ते समंत न होऊ दिल्याने, ओबीसींची प्रगती खुंटली गेली आहे.जेव्हा आम्हाला आमचे सवैंधानिक अधिकार कळू लागले तेव्हा आम्ही आपल्या प्रतिनिधीत्वाची मागणी करु लागले तर काही लोक आमच्या या हक्काच्या लढाईविरोधात आरक्षण हटाव मोहिम राबविण्यासाठी सरसावले आहेत,याचा पुरेपुर विचार करण्याची खरी गरज आज प्रत्येक ओबीसींची झाली आहे. आज प्रत्येक राजकीय पक्ष हा ओबीसींना आपली मक्तेदारी समजत आला आहे. ओबीसींचे हक्क प्रस्थापित लाटत आले आहेत. परिणामी,ओबीसी आपल्या हक्कासाठी एकवटत असल्याचे पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानेच सर्वच पक्षांच्या कधीच कार्यरत नसलेल्या ओबीसी आघाड्या आत्ताच सक्रीय होऊ लागल्या आहेत ही आपल्या ओबीसी आंदोलनाच्या यशाचे सुरवातच असल्याचे विचार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशालचंद्र बोपचे यांनी केले. ते भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने लाखनी येथील संत तुकाराम सभागृह व साकोली येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी भंडारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राजेश बांते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक जिवन लंजे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक डॉ.अजयराव तुमसरे,श्रावण कापगते,राजु कामथे,श्री भोयर,प्रशांत वाघाये,उमेश qसगनजुडे,भुपेश वाघाये,भाष्कर गिहेपुंजे,डॉ,अतुल दोनोडे,प्रदिप मासुरकर,केवळराम लांजेवार,उमेश भांडारकर,नंदलाल गभणे,लिलाधर पटले,छाया पटले,प्रकाश करंजेकर,विष्णु रणदिवे,निर्मला कापगते,सावित्रीदेवी बोपचे,नरेंद्र वाडीभस्मे आदी मान्यवर उपस्थित होते.img_20161112_132533वेळी बोलतांना भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी आपल्या ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघर्ष कृती समिती चांगले कार्य करीत असून सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन होत असलेले हे कार्य गावागावापर्यंत पोचविण्यासाठी ओबीसी संघटनेची शाखा बांधणी आवश्यक असल्याचे सांगत आजपर्यंत आम्हा ओबीसींना सर्वांनीच भुलथापा दिल्या असून आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होणे गरजेचे असल्याचे विचार मांडले.तसेच ओबीसीवर दाखल होणारे खोटे अट्रासिटीच्या गुन्हयाचा तपास योग्यरितीने करुन ओबीसीवर कुठल्याही पध्दतीने अन्याय होणार नाही याची काळजी घेत कायद्याचा गैरवापर होणार नाही यावर सरकारने लक्ष द्यावे असे विचार व्यक्त केले.ओबीसींच्या विद्याथ्र्यांना मिळत नसलेल्या शिष्यवृत्तीसंबधी आपण या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली.जिवन लंजे यांनी गेल्या चार पाच दिवसापासून साकोली विधानसभेतील गावागावात जाऊन ओबीसीं सघटनेच्या या बैठकांची माहिती देण्यात आली असून आत्ता कुठे लोकांना आपण ओबीसी असल्याची जाणीव होऊ लागल्याने पुढे येत असल्याचे सांगितले.येत्या काळात पुन्हा या तालुक्यात बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक डॉ.अजय तुमसरे यांनी साकोली विधानसभा मतदारसघातील प्रत्येक गावापर्यंत ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाला पोचविण्यासाठी आम्ही सर्वजण कुठलाही राजकीय द्वेष मनात न बाळगता सर्वच राजकीय पक्षातील नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते याना सोबत घेऊन ८ डिसेंबरच्या महामोच्र्याला कसे यशस्वी करता येईल याचे नियोजन करण्यासाठी जिल्हापरिषद स्तरावर बैठकां घेऊन माहिती पोचवू असे सांगितले.ओबीसी सेवा संघाचे मार्गदर्शक भोयर यांनी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करीत आहोत परंतु जनतेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही,परंतु यावेळी सर्वच राजकीय पक्ष मतभेद बाजुला सारुन एकत्र येत असल्याने हे आंदोलन यशस्वी होण्यास सहकार्य मिळेल अशा आशावाद व्यक्त केला.प्रा.qझगरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कशापध्दतीने ओबीसीसांठी राज्यघटनेत तरतुद करुन दिली आणि कुणी त्याचा विरोध केला.मंडल आयोग लागू करण्याची वेळ आली तेव्हा कुणी विरोध केला याचे सविस्तर विवेचन सादर केले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख व ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोंजक खेमेंद्र कटरे यांनी ८ डिसेंबरचा मोर्चा हा कुणा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून राज्यघटनेनेने दिलेल्या अधिकारासाठी आहे असे सांगत येत्या २७ नोव्हेंबरच्या महिला महाधिवेशनातही महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.बैठकीला दिनेश खोटेले,गोवर्धन बोपचे,गिरीश यावलकर, इंजि.राहुल तवाडे,उमेश कठाणे,सुशील बनकर,युवराज कापगते,प्रमोद आकरे,सुनिल रुखमोडे,आशिक गणवीर,उमेश भांडारकर,व्ही.एन.खोटेले,विजय चांदेवार,लिलाधर पटले,हेमराज चांदेवार,सोमेश्वर धांडे,सुधिर काळे,लक्ष्मण बावनकुळे,विशाल हटवार,गंगाधर लुटे,आनंदराव उरकुडे,पांडुरंग खंडाईत, प्रफुल खेडीकर,भास्कर गिर्हेपुंजे,उमराव आठोडे,विनोद वरकड,अशोक गायधनी,माधवराव भोयर,संजय लोहबरे,एस.एम.वनवे,नंदलाल काडगाये,यशवंत लोहबरे,जितेंद्र फसाटे आदी लाखनी व साकोली तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.