वाशीम,दि.2 – वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मुंगळा व मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलाब पुंडलिक इंगळे (रा. मुंगळा) व भास्कर ज्ञानदेव आगळे (रा. तऱ्हाळा) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. इंगळे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. आगळे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी (दि. 1) रात्री आत्महत्या केली.