शासकिय योजनांच्या प्रचारासाठी ‘शंभर दिवस शंभर गाव’ यात्रा

0
7

अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात यात्रेला प्रारंभ,नागरिकांचा उत्स्पूâर्त प्रतिसाद

गोंदिया,दि.२६:- भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचारासाठी शंभर दिवस शंभर गावातून यात्रेला भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात बिरसोला येथील संगम घाटावरून २२ पेâब्रुवारीपासून सुरूवात करण्यात आली आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेच्या कल्याणासाठी अनेक जनहितकारी योजना राबवित आहे. तेव्हा त्यात गर्भवती महिलांसाठी सहा हजार रूपये अनुदान योजना,प्रत्येक घरात विद्युत कनेक्शन योजना,मुद्रा लोन योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनांचा पाहिजे त्या प्रमाणात प्रचार न झाल्यामुळे त्या योजना नागरिकांपर्यंत पोहचत नाही. तेव्हा त्या योजनांचा प्रचार करण्यासाठी अ‍ॅड.विरेद्र जायस्वाल यांनी ही प्रचार यात्रा काढली आहे. सदर यात्रा ही आतापर्यंत गोंडमोहाडी, डाकराम सुकडी, चांदपूर, कोरणीघाट या गावापर्यत पोहचली असून प्रत्येक गावात वेंâद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल व शंभूशरणसिंग ठावूâर प्रवृत्त करीत आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच शासकिय योजनांचा प्रसार व करण्यासाठी अशा प्रकारची यात्रा काढण्यात आली असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शंभर दिवसात शंभर गावांमध्ये या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत आहे. नागरिकही मोठया प्रमाणात या अभियानात सहभागी होवून गर्दी करीत आहेत.