ग्रामपंचायतीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करा -डॉ. दयानिधी

0
16

गोंदिया,दि.०२ : प्रत्येक गावातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दीष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे. शौचालय केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक असून उद्दीष्टपूर्तीसाठी ग्रामपंचायतींच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करा, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात १ मार्च रोजी सकाळी १0 वाजता ग्रामसेवकांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस. डी. मुंडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, पं. स. चे गटविकास अधिकारी जावेद इनामदार, साहाय्यक गटविकास अधिकारी आर. के. दुबे यावेळी उपस्थित होते.
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत गुडमॉनिर्ंग पथकाचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. त्याबद्दल प्रशंसोद्गार काढून वैयक्तिक शौचालय, नादुरुस्त शौचालय, शेअरिंग शौचालयांचा ग्रामपंचायत निहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजनेचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन नरेगा व करवसूलींचा देखील याप्रसंगी आढावा घेण्यात आला.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ग्रामपंचायतींसाठी जिल्हा ग्रामविकास निधी असतो. त्यातून लाभार्थ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून देता येवू शकते. यासोबतच महिला बचत गटातूनसुद्धा कर्ज घेऊन लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणचे आवाहनही त्यांनी केले.
संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन हागणदारीमुक्तीचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी व्यक्त केले. आढावा बैठकीत नादूरुस्त व शेअरिंग शौचालयांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासह स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ग्रामपंचायत संपर्क अधिकारी आर. टी. निखारे, जी. एम. भायदे, सी. एच. गौतम, आर. जे. बन्सोड यांचा तसेच ग्रामपंचायत चोरखमारा, सर्रा, मारेगाव, नवरगाव, नवेझरी, कुल्पा, बिहिरीया, कवलेवाडा, पालडोंगरी, अजुर्नी, खुरखुडी, पांजरा, सुकळी, मरारटोला, पूजारीटोला, ठाणेगाव, बेरडीपार खु, बोरगाव येथील ग्रामसेवकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोबतच स्वच्छ भारत मिशनचे गटसमन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक छाया बोरकर, सुरेश पटले, अनूप रंगारी यांचेसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उत्कृष्ट कायार्साठी अभिनंदन केले.