चार गावांचा पाणीपुरवठा बंद होणार-किशोर तरोणे

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.२७:- तालुक्यातील सुजल बहुउद्देशीय सामाजिक संस्था नवेगावबांधच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या खांबी व अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील 4 गावांचा पाणीपुरवठा थकीतवसुलीमुळे बंद करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी दिली आहे.या दोन्ही योजनेंतर्गतच्या गावांना संस्थेच्यावतीने पाणीपुरवठा करुन देखभालदुरुस्ती करण्याचे काम आहे.मात्र चापटी,माहुरकुडा,गोठणगाव भाग 2 व अर्जुनी मोरगाव या 4 गावांची पाणीपट्टी वसुली ही 50 टक्यापेक्षा कमी असल्याने या गावांना पुरवठा करण्यात येणारा पाणीपुरवठा 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय संस्थेच्या मंडळाने घेतला आहे.