आमगाव- महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषदेचे विघटन करून आमगावला नगरपंचायत आणि रिसामा, कुंभारटोली, बिरसी, किडांगीपार, बनगाव, माल्ही, पदमपूर या सात गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा बहाल करण्यात यावा, याकरिता अधिसूचना काढली. मात्र, या अधिसूचनेला 6 महिने लोटूनही अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने या 7 गावांतील त्रस्त झालेल्या शेकडो संख्येत येऊन नागरिकांनी निकेश बाबा मिश्रा व तिरथ येटरे यांच्या नेतृत्वात अमर वराडे, सौरभ रोकडे, राजकुमार पुराम, संपत सोनी, जगदीश चुटे, बालू वंजारी, देवकांत बेहेकार, इसलाल भालेकर,भुमेश शेंडे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या 7 गावात रस्ते बांधकामाचा प्रश्न, घरकूल आणि विविध समस्यांनी हे सात गावातील नागरिक त्रासलेले होते.परंतु, शासन या गावांना ग्रामपंचायतीच्या दर्जा देण्यासाठी दिरंगाई करत आहेत.असा आरोप करुन बनगाव,बिरसी,पदमपुर, किडंगीपार येथील नागरिकांनी धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढला. यावेळी राजेश अग्रवाल, मुनेश पंचेश्वर, घनश्याम रहांगडाले, पिंटू अग्रहरी, संगीता पाथोडे, सोनू महानंदी, अनिता ठाकरे तसेच पुरुष महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोंडगाव सुरबन येथील युवकांनी केलेले कार्य प्रेरणादायी – लायकराम भेंडारकर
अखेर युवकांच्या पथक परिश्रमातून सुरू झाली गोरगरिबांची शाळा
अर्जुनी-मोर- हल्ली युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. विवाह सोहळे वाढदिवस आणि विशेषतः होळीच्या सणाला डीजेच्या तालावर नाचून प्राधान्याने मद्य घेण्याची परंपरा असतेच परंतु या परंपरेला फाटा देत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथे युवकांनी गरीब फाउंडेशन संघटनेच्या व्यासपीठाखाली एकत्र येत शिमगोत्सवातून जमा झालेला पैसा मटन पार्टी अथवा व्यसनात व्यर्थ खर्ची न करता धनदांडग्या श्रीमंत मुलांना मिळत असलेला कॉन्व्हेंटचे शिक्षण आपल्या गावातील ही गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळाव यासाठी स्थानिक जिल्हा परिषद शाळेतच पूर्व प्राथमिक (कॉन्व्हेंट) समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. या युवकांचा हा आदर्श प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केले.
जवळील बोंडगाव सुरबन येथे ता. ०३ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट ) च्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार शिवसेना जिल्हाप्रमुख शैलेश जायसवाल, उपसभापती संदीप कापगते, भिवाजी मलगाम, देवराम हलमारे, हेमराज मानकर, पुरुषोत्तम चोरवाडे, मार्कंड चोरवाडे, दिलीप सयाम पो.पा.मनोज मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष गोवर्धन राऊत, ग्रामसेवक टीकाराम जनबंधू सुशीला हलमारे, नारायण हटवार, संचित वाढवे, सरपंच पुष्पाताई डोंगरवार, धनंजय हटवार, पुंडलिक ठलाल, हितेश हलमारे, नरेश बोरकर , रमेश बोरकर, राजेंद्र मारबते, शिवकुमार गोदेले, धनराज हर्षे, हिरालाल मानकर, उदाराम सयाम, सत्यशीला मडावी, किरण मानकर, रीना डोंगरवार, मीनाक्षी वंजारी, दीक्षा डोंगरवार, माधुरी सांगोळे, माया सयाम, मंजुषा हलमारे, कुंदा कोडापे, भास्कर दखणे, व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की स्थानिक युवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला गावातील नागरिक व शिक्षकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे परिस्थिती आता बदलत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता खाजगी होणार, खाजगी शाळांना परवानगी दिली जाते असा भ्रम प्रसविला जातो. परंतु शासनाकडून असे कुठल्याही नवीन शाळेला परवानगी देण्यात आली नाही. पालकांनीही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे केवळ शासनावर अवलंबून राहता या युवकांप्रमाणेच गावकऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत शिक्षकांनीही केवळ वेतनापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे केवळ मैदानी खेळ नव्हे तर सांस्कृतिक बौद्धिक खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश सहारे, निखिल वाढवे, योगेश बोरकर, मनोहर मानकर, हितेंद्र शहारे, पंकज दरवडे, विलास हटवार, चेतन बोरकर, भोजराज मानकर, मुकेश नेवारे, राजेश मेश्राम, रुपचंद मानकर, समीर मेश्राम, टिंकू मेश्राम, हर्षल हटवार, आदी युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन सुरज डाखोळे यांनी तर आभार मुख्याध्यापक यशवंत शेंडे यांनी मानले.
सालेबर्डी येथे चित्रकला स्पर्धा व वृक्षारोपण
तिरोडा- तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सालेबर्डी येथे सहकार सप्ताह निमित्ताने एक पेड मॉं के नाम या विषयावर सहाय्यक निबंध कार्यालय तिरोडा वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. विजयी विद्यार्थ्यांना जिल्हा उपनिबंधक (डी डी आर) अर्चना माळवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार कु शितल चक्रधर लांडे,
रोख 551 रुपये, द्वितीय पुरस्कार कनक उमाशंकर दमाहे रोख 351 रुपये व तृतीय पुरस्कार गुंजन जिवतू बाभरे 251 रुपये रोख ही पुरस्काराची रक्कम जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडून देण्यात आली. तसेच एक पेड माॅं के नाम ह्या उपक्रमांतर्गत जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, तिरोडाचे सहाय्यक उपनिबंधक डी.आर. नवगिरे, आमगावचे सहाय्यक उपनिबंधक हरिहर कुहिकर ,बबीता गिरीपुंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेत पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे , शिक्षण विस्तार अधिकारी जे डी अंबुले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमाशंकर दमाहे, शाळेचे मुख्याध्यापक के एस राहंगडाले, सहायक शिक्षक जे ए जांगडे, भूषण झरारिया, कुमारी आमरीन सय्यदा उपस्थित होते.जिल्हा उपनिबंधक श्रीमती माळवे ह्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले.
मुख्याध्यापक विजय पटले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
तिरोडा-तालुक्यातील प्रगती हायस्कूल सरांडी चे मुख्याध्यापक विजय मोडकुजी पटले हे नियतकालिन वयोमानानुसार दि.३०/६/२०२५ ला सेवानिवृत्त झाले.दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीपर सपत्नीक शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रगती हायस्कूल सरांडीचे माजी मुख्याध्यापक रामसागर धावडे, संस्थेचे सचिव डॉ.अभय पाटील, संस्थेचे अध्यक्ष माणिक वाणी, इतर पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षिका जयाताई धावडे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात उपस्थित होते.सत्कार समारंभात अत्यंत भावूक होऊन बोलताना मुख्याध्यापक विजय पटले म्हणाले की मी माझे संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व गुणवत्ता वाढीसाठी समर्पित केले होते.विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा व माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला प्रेम आपुलकी माझ्या जिवनाची शिदोरी असेल, प्रगती हायस्कूल सदैव माझ्या स्मरणात कोरलेले असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा कार्यरत असेल.
तिरोडा शहरके मुख्य बाजार मे स्थित पुराने हॉस्पिटल के जगहपर नगर परिषद ने बनाया डंपिंग यार्ड ?
तिरोडा – नगर परिषद के कुछ कचरा गाड़ीवाले तिरोडा शहरके मध्य मे स्थित पुराने हॉस्पिटल के खाली जगहपर कचरा डालते हैं। बारिश की वजह से सड़े हुए कचरे से बहुत ही दुर्गंध आती है। कांग्रेस ऑफिस के सामने स्थित इस स्थान पर डाले हुए कचरे की गंदगी से आजू-बाजू रहने वाले नागरिक और दुकानदार लोग बहुत परेशान हो गए हैं। इस गंदगी से नागरिकों का स्वास्थ्य भी खतरे में आया है। संबंधित विभाग ने तुरंत ध्यान देने की जरूरत है।
कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव
बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यस्तरीय एसआयटी करणार चौकशी
आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न : शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती
नागपूर- विभागातील शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागासह संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे राज्यातील बोगस शिक्षक पदभरती / शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा. यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याची मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी शुक्रवार (ता. ४) विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली. या प्रकरणाची प्रशासकीय, पोलिस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून यात आयएएस, आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर देतांना सांगितले.
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अराजकता माजली आहे. शिक्षक पदभरती घोटाळा, शालार्थ आयडी घोटाळा नागपूर या उपराजधानीत उघडकीस आला आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे राज्यभर पसरली आहेत. २ मे २०१२ पासून शिक्षक पदभरती बंद करण्यात आली. फेब्रुवारी २०१३ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २०१३ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या डीएड धारकांच्या नियुक्तीस मृत शिक्षणाधिकारीच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली. २०१९ नंतर या पदभरतीस बोगस शालार्थ आयडी मिळविण्यात आला. यातून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची लूट करण्यात आली. या घोटाळ्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक, आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून जवळपास १००० कोटींच्या वर भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे.
नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नियुक्तीस मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यस्तरावर तात्काळ एसआयटी नियुक्त करावी. एसआयटीमध्ये गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करावा. नागपूर विभागातील बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळ्यातील निलंबित सूत्रधार गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे. त्याला अटक कधी करणार? या घोटाळ्यात १८ च्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांना बडतर्फ करावे तसेच त्यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी, आदी प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले.
यावर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तरात नागपूर, भंडारा, नाशिक व जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्याची मागणी पोलिस विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच संचालक, सहसंचालक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती बघता राज्यस्तरीय एसआयटी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार असून, यात गृह, शिक्षण विभागातील निवृत्त अधिकारी व उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भोयर सांगितले.
एड.लखनसिंह कटरे यांनी दिला ग्रा.पं.सदस्यत्वाचा राजीनामा
गोंदिया,दि.०४ः ग्रामविकासाची सर्वांगीण व शाश्वत अशी विकासाची संकल्पना जी संयुक्त राष्ट्राने प्रस्तावित केली आहे,ती संकल्पना आपल्या अडीच वर्षाच्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदावर राहून सरपंच व इतर सदस्यांच्या मनात उतरवण्याचे सातत्याने प्रयत्न करुनही त्यात असमर्थ ठरल्याने सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक एड.लखनसिंह कटरे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंचपदाचा राजीनामा १ जुर्ले रोजी ग्रामपंचायत सरपंचाना सादर केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ग्रामपंचायत मधील वार्ड क्रं.३ मधून सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक राहिलेले एड.लखनसिंह कटरे यांनी निवडणूक लढली होती.निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर उपसरपंच पद ही मिळाले.आपण आपल्या गावाचा सर्वांगीण विकासाच्या ध्यास मनात घेत ग्रामपंचायततमधील प्रशासकीय कामकाजात विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन पाऊल ठेवले होते.परंतु आपल्या अडीच वर्षाच्या काळात सरपंच व सदस्यांकडून त्याकरीता पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने प्रशंसनीय व डोळ्यात भरण्यालायक असे कार्य आपणास करता आले नाही,ही बाब स्विकारत आपल्या ग्रामपंचायत सदस्यत्वासह उपसरपंच पदाचा राजीनामा एड.कटरे यांनी दिला.त्यांच्या या राजीनाम्याने ग्रामपंचायत प्रशासनात चांगले व्यक्ति जे शाश्वत विकासाची कास मनात घेऊन जाण्याची इच्छा ठेवतात अशा नागरिकांसमोर एक प्रश्न उभा ठाकला आहे.
सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देवून सन्मान
गोंदिया : ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज कार्यक्षम करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ग्राम पंचायतींना आयएसओ मानांकन दिले जाते. यात सेजगाव ग्राम पंचायतीने बाजी मारली असून आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. नुकतेच प्रमाणपत्र देवून सेजगाव ग्राम पंचायतीचा सन्मान करण्यात आला.
केंद्र सरकारच्या सूचनांनुसार पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागाअंतर्गत आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी ई-पंचायत प्रकल्प राबवण्यात येत आहे. ग्रामपंचायतींच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ग्राम पंचायतींमधील कागदपत्रांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे आयएसओ प्रमाणीकरण करून घेतले जात आहे. आयएसओ मानांकन घेण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करावा याचे वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले होते. त्यानुसार राज्य आणि जिल्हा पातळीवर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यमापन करून त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. यानुसार सेजगाव ग्राम पंचायतीने शासनाने दिलेल्या निकषानुसार कामगिरी करून उत्तम ठरली आहे.
वैयक्तिक – सार्वजनिक शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र वा राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापर बंदी, ग्रामपंचायतीच्या घरपट्टी वा पाणीपट्टी वसुली आदिमध्येही सेजगाव ग्राम पंचायतीने दमदार कामगिरी करीत नाव लौकिक केले आहे. या कामगिरीची दखल घेत सेजगाव ग्राम पंचायतीला आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. नुकतेच सरपंच सौ.उषा कठाणे, उपसरपंच टेकचंदउ बिसेन यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्विकारले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य टी.एल.पारधी, गौरीशंकर पारधी, ग्रा.पं.अधिकारी अतुल ठाकरे, भिकराम रहांगडाले, तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते.
मंदीरासमोर भरधाव कार चालकाने 6 जणांना उडवले, दोन जणांचा मृत्यू
छत्रपती संभाजिनगर,दि.4- सिडकोतील काळा गणपती मंदीरासमोर एका कारचालकाने सहा जणांना उडवल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या भिषण अपघातात मंदीरचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60, राहणार एन-2, विठ्ठल नगर, छत्रपती संभाजिनगर यांचा जागिच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत दुस-या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे परंतु नाव समजले नाही असे एमआयडिसी पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत एकनाथ मगर, वय 30, राहणार सिडको, छत्रपती संभाजिनगर हा गारखेडा येथील क्रीडा संकुल येथून टेनिस खेळून परतला होता. काळा गणपती मंदीरासमोर स्विफ्ट डिझायर कार क्रं.MH-20, HH-0746 वरील ताबा सुटल्याने हा भिषण अपघात घडला.
मंदीरासमोर टर्न घेताना त्याने निष्काळजीपणे भरधाव वेगाने कार चालवत रस्त्यावर चालणा-या नागरीकांना धडक दिली. यामध्ये सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे, वय 60 हे गंभीर जखमी होऊन या घटनेत त्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहे. जखमी विकास समधाने, वय 50 व मनिषा विकास समधाने, वय 40, यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविंद्र भगवंतराव चौबे, वय 65, श्रिकांत प्रभाकर राडेकर, वय 69 यांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नातेवाईक अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवत असल्याची माहिती आहे.