36 C
Gondiā
Saturday, May 17, 2025
Home Blog Page 5681

वृक्षलागवडीसाठी जिल्हाधिका-यांना विद्यार्थ्यांचे निवेदन

0

गोंदिया, दि. ३१ :-गोंदिया शहरातील काही विद्यार्थ्यानी एकत्र येवून समाजासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेवून ङ्कङ्कमाझी भेट निसर्गासाठीङ्कङ्क या गटाची स्थापना केली. या गटातील काही सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नुकतीच भेट घेवून गटामार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाला पाठबळ देण्याची अपेक्षा जिल्हाधिका-यांकडे निवेदनातून व्यक्त केली. गोंदिया शहरात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आर्रोग्यावरही होत असल्याबाबत जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या या गटाने त्यांच्या कार्याची सुरुवात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षलागवडीपासून करण्याचे निश्चित केले. भविष्यात नदीची स्वच्छता करणे, पेपर, प्लास्टिक, ग्लास, पॉलीथीनचा पुनर्वापर याबाबत जनजागृती करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बदल करण्यासाठी आमचा गट काम करणार असून सोबत लोककल्याणाचे विविध उपक्रम राबविणार असल्याचे गटातील विद्यार्थ्यानी जिल्हाधिका-यांना सांगितले.

अवयवदान – काळाची गरज

0

गोंदिया,दि ३१ आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे मानवाचे आर्युमान उत्तरोत्तर वाढतच चालले आहे. विविध व्यक्तीवर परिणामकारक उपाययोजना अस्तित्वात असली तरी एक अवयव निकामी झाल्यास दुसरा अवयव प्रत्यारोपण करण्याव्यतिरिक्त दुसरा उपाय नाही, व तो अवयव उपलब्ध न झाल्यामुळे रुग्ण प्राणाला मुकतात.देशभरातील अवयवदानाचे प्रमाण अजूनही १० लाख लोकसंख्येमागे केवळ ०.५ टक्के इतकेच आहे. वर्षभरात देशामध्ये तब्बल दोन ते अडीच लाख किडनीची गरज असतांना केवळ ७ हजार किडनीचे प्रत्यारोपण होत आहे. ५० हजार हृदयाची गरज असतांना केवळ ५० ते ६० हृदयांचे प्रत्यारोपण होत आहे. ५ हजार यकृतांची गरज असतांना १०० ते २०० यकृत मोठया मुश्किलीने प्रत्यारोपण होत आहेत ही आजची वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच अवयवदानाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र सरकार ने तीन दिवस महा अवयवदान अभियान व्यापकपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानातून इच्छुक दात्यांचा ङ्कडाटाङ्क तयार होणार आहे. डाटामुळे अवयवदानाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे.अजूनही अवयवदानाबाबत खूप कमी माहिती देशवासियांना आहे. १.४ लाख लोकांचा दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो. या सर्व लोकांकडून अवयवदान झाले तर किडनीसह इतर बहुतेक अवयवांची देशभरातील गरज पूर्ण होऊ शकते. अमेरिका,ब्रिटन,जर्मनी, नेदरलॅड मध्ये कुटुंबाच्या संमतीव्दारे अवयवदानाची पध्दत आहे.
सिंगापूर,बेल्जीयम,स्पेनमध्ये व्यक्तीने जिवंतपणी अवयवदानास नकार न दिल्यास व्यक्तीची मरणोत्तर अवयवदान संमती गृहीत धरली जाते. तसे पाहिले तर भारतात बहुतांश व्यक्ती जिवंतपणी दानधर्म, देवधर्म, तप-तपस्या या मरणोत्तर आत्मशांती व अमरत्व प्राप्तीसाठी करतात पण अवयवदान हे मानवाच्या इतिहासातील अमरत्वाकडे जाणा-या वाटचालीतील पहिले पाऊल आहे. अवयवदाता अवयवदान रुपाने इहलोकी निवास करतो.
एवढेच नाही तर बहुविध जाती धर्माच्या समाजाला अवयवांच्या देवाण घेवाणघेवाणीतून एकत्र बांधणारे अवयवदान हे सूत्र मानवाच्या हाती लाभले आहे.पूर्वीच्या काळात सुरुवातीला रक्तदानासाठी दाते स्वइच्छेने समोर पुढाकार घेत नव्हते पण काळाच्या ओघात रक्तदान सर्व सामान्य झाले आहे. कुठलाही निरोगी सुदृढ व्यक्ती जिवंतपणीच एक मुत्रपिंड, लिव्हरचा काही भाग, फुप्फुसाचा काही भाग, आतडयांचा काही भाग, स्वादुपिंडाचा काही भाग अवयवदानाव्दारे दुस-या गरजू व्यक्तीला देऊन त्याला संजिवनी देऊ शकतो. ब्रेनडेथ झालेली व्यक्ती दोन्ही मुत्रपिंड, हृदयाच्या झडपा, हृदय,आतडे,संपूर्ण यकृत,संपूर्ण फुफ्फूस जोडऊती, त्वचा,संपूर्ण स्वादुपिंड,अंगदान देऊ शकतो.
कुठलीही व्यक्ती मरणेपरांत संपूर्ण देहदान, नेत्रदान ( ४ ते ६ तासातच), त्वचादान ( ६ तासातच) दान देऊन जिवंत व्यक्तीला संजीवनी देऊ शकतो.ब्रेन डेड म्हणजे मेंदूला गंभीर स्वरुपाचा जोराचा मार लागल्यावर किंवा मेंदुत रक्तस्त्राव झाल्यानंतर किंवा एखादया आजारामध्ये मेंदू निकामी झाल्यावर संबंधित व्यक्ती ब्रेनडेड झाल्याचे वैद्यकीय शास्त्रात म्हंटले जाते. आणि अशा व्यक्ती पुन्हा जीवंत होऊ शकत नाही. अशा ब्रेनडेड व्यक्तीचे शरीरातील मूत्रपिंड,हृदय,फुफ्फूस,आतडे आदि अवयव चांगल्या स्थितीत कार्यरत असतात आणि या अवयवांचे गरजू ‍िजवंत रुग्णांवर योग्य वेळेत प्रत्यारोपण होऊ शकते .
ब्रेनडेड रुग्णांच्या शरीरातील अवयवदान हे त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी दुस-या व्यक्तीचे जगणे शक्य केल्यामुळे ङ्कङ्कपुनर्जन्मङ्कङ्क झाल्याची भावना दु:ख हलके करु शकते. त्याकरीता सामाजिक संवेदनशिलतेला साद घालून संतुलन बाळगून व समुपदेशनाची पराकाष्ठा करुन योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.एखादयाचा जीव वाचविण्यासाठी मृतदेहातून ( अंतविधी करण्याऐवजी) अवयव काढल्यास तो शरीरभंग झाला असे म्हणता येणार नाही. किंबहुना दुस-या व्यक्तीची विझणारी प्राणज्योत चेतविणे पुन्हा त्या संजीवनी प्राप्त करुन देणे हाच मानव धर्माचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. देण्याचा आनंद अवर्णनीय असतो. म्हणून अवयवदान करुन जीवन वाचवायलाच हवा.
म्हणून चला तर आज आपण सर्वजण मिळून संकल्प करु या … अवयवदान करु या ..आटत नसतो रक्ताचा झरा दर तीन महिन्याला रक्तदान करा ेेंं मरावे परि नेत्ररुपी उरावे ेेंं
डॉ. सुवर्णा हुबेकर
वैद्यकीय अधिकारी
बाई गंगाबाई महिला रुग्णालय,गोंदिया

सालेकसाजवळ मालगाडीचा डबा घसरला

0

सालेकसा : हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर सालेकसानजिक मालगाडीचा डबा रूळावरुन उतरून फरफटत गेल्याने १0 तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. घसरलेल्या डब्यामुळे ३00 मीटरपर्यंतच्या रूळावरील सिमेंटचे स्लीपर तुटून निकामी झाले. त्यामुळे नागपूर, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या अपलाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवसभर रेल्वे लाईनच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
मध्यरात्रीनंतर साधारणत: १.३0 वाजताच्या सुमारास रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने जात असलेली सदर मालगाडी सालेकसा स्टेशन येण्यापूर्वी दोन कि.मी. अंतरावर असताना मालगाडीच्या मधल्या डब्याच्या चाकांमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तो डबा रूळावरुन खाली उतरला. त्यामुळे डब्याच्या उजव्या बाजूची सर्व चाके दोन रूळांच्या मध्ये असलेल्या सिमेंटच्या स्लिपरवरुन चालू लागली. यामुळे ते स्लिपर मधातून तुटू लागले. जवळपास ३00 मीटरपर्यंत डबा फरफटत गेल्याने त्यातून आगीच्या ढिणग्या निघू लागल्या. ही बाब हलबीटोला गेटवरील चौकीदाराच्या लक्षात आली. त्याने लगेच चालक आणि गार्ड यांना यासंदर्भात कळविले. त्यांनी लगेच गाडी थांबविली. वरिष्ठांना या घटनेची सूचना दिल्यानंतर रायपूरवरुन नागपूरकडे धावणार्‍या सर्व गाड्या मध्येच थांबविण्यात आल्या.

देशाभिमान जागृत होईल तेव्हा जगावर राज्य करू! -खा. पटोले

0

अर्जुनी-मोरगाव दि. 3१: : देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशाबद्दलचा स्वाभिमान कमी होत चालला आहे. काश्मिरमध्ये अर्धा काश्मिर भारताला भारत मानत नाही. तिरंगा आमच्या देशाची शान आहे. प्रत्येक नागरिकांमध्ये जेव्हा स्वाभिमान जागृत होईल त्या दिवशी आपण जगावर राज्य करू, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.
ते वन, पोलीस विभाग व पत्रकार संघातर्फे प्रतापगड महादेव मंदीर मार्गावरील स्वच्छता कार्यक्रमात बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रतापगडच्या सरपंच अहिल्या वालदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खा. नाना पटोले उपस्थित होते. यावेळी मंचावर परिविक्षाधिन वन अधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अर्जुनीचे ठाणेदार नामदेव बंडगर, केशोरीचे सहायकपोलीस निरीक्षक एस.एस. कुंभरे, उपसरपंच राऊत, मुकेश जायस्वाल, प्रमोद लांजेवार, डॉ.गजानन डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष छाया डोंगरवार उपस्थित होते.
खा.पटोले पुढे म्हणाले, केंद्र शासनाने भारत स्वच्छ अभियानाचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छता मोहीम राबविली जाते. वन अधिकारी राहुल पाटील यांची उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीयांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्याची जबाबदारी दिली. हल्ली देशाबद्दलची आपुलकी, स्वाभिमान कमी होत चालला आहे. ज्यावेळी इंग्रजांचे राज्य होते तेव्हा आमच्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलल्या. बंदूक किंवा बॉम्बगोळ्याच्या आधारावर इंग्रजांना या देशातून परतवून लावता आले नसते. पण देशवासीयांनी जीव गेला तरी चालेल, रक्ताच्या नाल्या वाहल्या तरी चालतील पण स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबणार नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले. हल्ली देशात आतंकवाद, नक्षलवाद वाढला आहे. ती आपल्यातीलच लोक आहेत. परंतु दुर्दैवाने घर का भेदी लंका ढहाये, अशी अवस्था आहे.देशाच्या प्रगतीसाठी देशाभिमान जागृत करण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, विद्यार्थी आमचे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी प्रत्येक बाबीची दिशा ठरवा. आत्मविश्‍वास व महत्वाकांक्षा बाळगा. कुठलीच गोष्ट अशक्य नाही. परिस्थितीला बदलविण्याच कामही युवापिढीच करू शकते.कचर्‍यासोबतच समाजातील घाण स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक राहुल पाटील यांनी मांडले. संचालन प्रा.शरद मेश्राम केले. आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले.मोहिमेसाठी एस.एस.जे. महाविद्यालय, सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयो पथक, प्रा.जलील खॉ पठाण, प्रा. इंद्रनिल काशिवार, वन कर्मचारी ब्राम्हणकर, कापगते आदींनी सहकार्य केले.

संघी टॉपर्स अवार्डचे वितरण

0

आमगाव दि. 3१: क्रीडा भारती गोंदिया जिल्हा द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्थानिक लक्ष्मणराव मानकर अध्यापक विद्यालय येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि वर्ग दहावी व बारावीमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा संघी टॉपर्स अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. दिलीप संघी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार पवार, पोलीस निरीक्षक सचिन सांडमोर, क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, डी.एस. भारसाकळे, प्रा. जयंत बन्सोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
सर्वप्रथम अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रांतमंत्री विनायक अंजनकर यांनी क्रीडा भारतीच्या कार्याचे विवेचन केले. अतिथींनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. खेळाडूंनी अधिक यश प्राप्त करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी वर्ग १२मध्ये जिल्ह्यात प्रथम किशोर काळबांधे व वर्ग १0 वीमध्ये जिल्ह्यात प्रथम चंचल अग्रवाल, राष्ट्रीय स्पर्धेत गोंदियाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू काजल चंदनबटये, प्रियंका बैस, शीतल शक्तीकर, जान्हवी रंगनाथन, राशी शेंडे, तनुश्री गौतम, अंजली टहल्यानी, सुमीरन चहाण, अंजली उके, यश तिवारी, तोपेश सावरकर, कुणाल तांडेकर, अभिषेक झॉ, प्रणय नंदागवली, किशोर राऊत यांचा रोख पुरस्कार व सिल्व्हर मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
खेळाडूंना स्व.डी. सत्यनारायण संघी यांच्या स्मृतीत डॉ. दिलीप संघी व परिवारतर्फे २0 हजार रुपयांचे पुरस्कार व सिल्व्हर मेडल देण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक, खेळाडूंचे पालक व मोठय़ा संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.

उड्डाण पुलावरील पाण्यामुळे होणारा त्रास दूर करा!

0

गोंदिया दि. 3१ : गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक संघटनेद्वारा नवीन उड्डाण पुलावर (ओव्हरब्रिज) पावसामुळे साठत असलेल्या पाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसून पुलावरचे पाणी येणार्‍या-जाणार्‍या वाहनांच्या रहदारीमुळे बाजूच्या किनार्‍याला ओलांडून पुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या लोकांच्या अंगावर उडते. याचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांच्याकडे केली.
वाहनावर हा पाणी पडल्याने सामान्य नागरिकांना तसेच विशेषत: राठोड टालकडे (गड्डाटोली मार्ग) जाणार्‍या नागरिकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यासंबंधी जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या सूचनेप्रमाणे शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. येत्या ८-१0 दिवसात ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन देण्यात आले. याप्रसंगी संजीव राय, रौनक ठाकुर, सौरभ वर्मा, प्रशांत ठाकुर, आकाश नेवारे, तपन केशवानी, विकास खोटेले, अक्षय सिंगनधुपे, योगेश राजाभोज, शुभम जायस्वाल, निलेश बहेकार, विजय खोटेले, आशिष मस्करे, रोहित कोहरे, शंकी उमरकर, हर्षीत चंदेल, शिवम मिश्रा, करण श्रीवास, नुपेंद्र हिगे, भुपेंद्र बिसेन, सौरभ रघुवंशी, राहुल कोरोटे आदी कार्यकर्ते व नागरिक होते.

उमरेड-कर्‍हांडलातून चांदी वाघिणीचे 3 बछडे गायब

0

गोंदिया,दि.30-शेजारील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कर्‍हांडला जंगलातून चांदी वाघिणीचे तीन बछडेही गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या महिन्यांपासून हे तिन्ही बछडे चांदी वाघिणींसोबत दिसत नाही. तर गेल्या चार महिन्यांपासून जय हा वाघही बेपत्ता आहे. आता चांदी वाघिणीचे तीन बछडेही गायब झाल्याने वन विभागाला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. चांदी वाघिणीने सहा महिन्यांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला आहे. पण सध्या चांदीसोबत फक्त एकच बछडा आहे. चांदी वाघिणीच्या या तीन बछड्यांसोबत घातपात झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. कारण सहा महिन्या बछडे आपल्या आईला सोडत नाही.असे असताना हे बछडे कुठे गेले याची माहिती सुध्दा वनविभागाचे प्रमुख स्पष्टपणे देऊ शकलेले नाहीत.

खापा येथे पोलीसांची आंदोलकावर लाठीचार्ज

0

तुमसर,दि.30 – तुमसर (खापा) येथील चौकात सुरु असलेल्या आंदोलनाला आज हींसक वळण लागले. आंदोलनकर्ते आपल्या मागण्यावर ठाम राहून उग्ररुप धारण केल्याने पोलीसांनी आंदोलकावर लाठीचार्ज केला.तर गावकऱ्यांनीही केली पोलीसावर दगडफेक पोलीस व गावकरी जख्मी, दगडफेक व लाठीचार्ज अर्धातास सुरु होता, ह्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख अभियंता श्री राजेंद्र पटले साहेब.

शास्त्री वार्ड ओबीसी कृती समिती अध्यक्षपदी खुशाल कटरे

0

गोंदिया,दि.30-येथील शास्त्री वार्ड निवासी ओबीसी बांधवांनी सोमवारला घेतलेल्या सभेत शास्त्री वार्ड ओबीसी कृती संघर्ष समितीची कार्याकारीणी गठित केली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमर वर्हाडे होते.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे संगठक कैलास भेलावे,ओबीसी सेवा संघाचे गोरेगाव तालुकाध्यक्ष प्रा.संजिव रहांगडाले उपस्थित होते. बैठकीत शास्त्री वार्ड ओबीसी कृती समिच्या अध्यक्षपदी खुशाल कटरे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सायकाळी ३ वाजता खुशाल कटरे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बंशीधर शहारे, बी.डब्ल्यू,कटरे, राजेश कापसे, डॉ. रुपचंद बघेले, भरत शरणागत, चंद्रकुमार बहेकार, आशिष नागपुरे, मनोज रहांगडाले, रामकृष्ण गौतम आदी समाजबांधव उपस्थित होते.यावेळी ओबीसी समाजावर गेल्या 60 वर्षापासून सुरु असलेल्या अन्यायाची माहिती देत ओबीसींचे अधिकार व आरक्षण हिरावून घेण्यात आल्याने आपला ओबीसी समाज आज विकासापासून व नोकरीतील मुख्य पदापासून वंचित राहिल्याची माहिती देण्यात आली.

नागरिकर हल्लाप्रकरणी ओबीसी संघर्ष समितीचे एसडीपीओंना निवेदन

0

गोंदिया,berartimes.com दि.30 : ओबीसी संघर्ष कृती समितीचे संगठक राजेश नागरीकर यांच्यावर नागरा येथील काही असामाजिक गुंड प्रवृत्तीच्या इसमानी २७ ऑगस्ट रोजी रात्रीला केलेल्या हल्याचा निषेध राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोंदिया जिल्हा ओबीसी कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने नोंदविण्यात आला आहे.या संबंधिचे एक निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बरकते यांच्यामार्फेत पाठविण्यात आले आहे. या निवेदनात ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघठक, महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश नागरीकर यांच्यावर हल्ला करणार्ङ्मा आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करीत त्याना जिल्हा तडीपार करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.यावर उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांनी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आर्मएक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली.तसेच नागरा भागाचे बीट जमादार याप्रकरणी दोषी असल्याचे शिष्टमंडळाने लक्षात आणून देत त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वèहाडे, संयोजक खेमेद्र कटरे, कैलास भेलावे, शिशिर कटरे, सावन डोये, चंद्रकुमार बहेकार,उदय चक्रधर,राजू वंजारी,भरत शरणागत,जगदिश रहागंडाले, प्रेमलाल गायधने,आशिष नागपूरे,एन.एल.गेडाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.