दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यु

0
10

गडचिरोली,दि.10-बोरी येथुन २कि.मी.अंतरावर असलेल्या दिना नदिच्या पुलावरुन दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुलाखाली कोसळल्याची घटना(MH34V4317)
आल्लापलीकडून शांतीग्रामकडे येत असतांना घडली.ही घटना काल दिनांक 9/09/18 राेजी रात्री 11:30. वाजता दरम्यान घडली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. या अपघातातील मृतकाची नावे सुभाष सुपदो मंडल 19 वर्ष. रा. पाखांजुर जि. कांकेर छत्तीसगढ़ व विशाल गौंरंग मोदक25वर्षे. रा. शांतीग्राम था. मुलचेरा अशी आहेत.घटनेची माहिती मिळताच राजपुर पॅच येथील पोलीस पाटील विलास निकेसर यांनी घटनास्थळावरुन पोलीस स्टेशनला माहिती दिली.अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक होळगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस पाटील व पो.ह.दुधे, मौदेकर, माने, हे तपास करित आहेत.