आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींचा विनयभंग;पाच जणांना अटक

0
10

गडचिरोली,दि.३०ः: जंगलात मित्रांसमवेत गप्पा करीत असलेल्या आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंगग करणाऱ्या पाच जणांना पेरमिली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा व मानतू शंकर इष्टाम(३०)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

भामरागड तालुक्यातील रहिवासी असलेली मुलगी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. ती शेजारच्या जंगलात मित्रांसमवेत गप्पा करीत असताना उपरोक्त पाचही जण तेथे गेले. त्यांनी पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग करुन मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने पेरमिली येथील पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी उपरोक्त पाचही आरोपींवर भादंवि कलम ३५४(अ)(ब), ३२३,५०४, ५०६,३४,बालैंअसं अधिनियम २०१२ च्या कलम ८ व १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ई)अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड घटनेचा तपास करीत आहेत.