होय १२ व्या वर्षी रामदास स्वामी लग्नातुन पळुन गेले, मोहनबुवा रामदासी

0
23

माढा(विशेष प्रतिनिधी),दि.31- होय रामदास स्वामी हे वयाच्या १२ व्या वर्षी लग्नातुन पळुन गेले होते.त्यांनी विवाह मंडपातुन पलायन केले. हा त्यांचा पुर्व प्लॅन होता, असे वक्तव्य सज्जनगड मठातील मोहनबुवा रामदासी यानी माढ्यात केले. माढा शहरात प्रवचनाच्या कार्यक्रमास आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.पुरोगामी संघटनांकडून रामदास स्वामी हे लग्नातुन पळुन गेले.अशी टीका सातत्याने होते.या विषयावर त्यांनी प्रवचनातुन ही कबुली दिली मात्र हा त्यांचा पुर्व प्लन होते असे त्यांनी म्हटले. त्यावर बोलताना रामदासी म्हणाले,रामदास स्वामी यांनी लग्न मंडपातुन पलायन केले हा त्यांचा ठरलेला पुर्व प्लॅन होता.त्यांचे वडिल बंधु गंगाधर स्वामीना रामदास यांनी सांगितले होते की मी काय प्रपंच करणार नाही.विश्वाचा प्रपंच करणारा मी आहे.वयाच्या ८ व्या वर्षी ही आईला ही त्यांनी ही गोष्ट सांगितले होती.भौतिक प्रपंचात पडणारे रामदास स्वामी नव्हते.विवाह मंडपातुन पळुन गेल्यावर रामदास स्वामी यांनी नाशिकला १२ वर्ष तपश्चर्या केली.असे सांगितल्यानंतर ते म्हणाले काही लोक म्हणतात स्वामीनी प्रपंच केला नाही मग ते कसे म्हणाले” प्रपंच करावा नेटका .!!या वर बोलताना ते म्हणाले स्वामीनी दास बोधात म्ह्टलेल्या नुसार केवळ कौटुंबिक प्रपंचावर नव्हे तर स्वामीनी समाजात आपण करीत असलेल्या प्रत्येक ठिकाणी करीत असलेल्या कामाच्या क्षेत्रात नीट काम करावे असे म्हटले आहे.तोच आपला प्रपंच असल्याचे सांगितले.