आमिरपेक्षा, शहीद महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

0
5
सातारा, दि. २४ – आमिर खानच्या वक्तव्याच्या मुद्यापेक्षा देशासाठी शहिद कर्नल संतोष महाडिक यांचा विषय जास्त गंभीर व महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांशी लढताना काश्मीरमध्ये शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या साता-यातील पोगरवाडी या जन्मगावी जाऊन शरद पवार यांनी महाडिक कुटुंबियांची  सांत्वनपर भेट घेतली. मात्र आमिरच्या देश सोडण्याच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमिरपेक्षा कर्नल महाडिक यांचा मुद्दा महत्वाचा असल्याचे सांगत पवार यांनी त्या मुद्यावर भाष्य करण्यास नकार दिला.
काल दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात आमिरने देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करतानाच या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने म्हटले होते. देशातील असहिष्णू वातावरणामुळे आपल्याला भीती वाटत असल्याचे आमिरने म्हटले होते.