राज्यपालांच्या नाताळनिमित्त शुभेच्छा

0
7

मुंबई दि, 25: राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ आज संपूर्ण मानवतेचा सण झाला आहे. हा सण येशू ख्रिस्ताच्या प्रेम, दया व क्षमा या सद्गुणांचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांचे जीवनकार्य तसेच त्यांच्या शिकवणीचे मनन हा एक उन्नत करणारा अनुभव आहे. नाताळचा सण सर्वांच्या, विशेषतः गरीब व उपेक्षितांच्या, जीवनात नवचैतन्य आणो अशी मी कामना करतो तसेच राज्यातील जनतेला नाताळ व नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे चे. विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.