देश न्यायालय चालवतंय की सरकार- राज ठाकरे

0
8
वृत्तसंस्था
मुंबई – ‘नीट‘ परीक्षा ही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले की हा देश न्यायालय चालवतंय की सरकार. सर्वोच्च न्यायालयाचा या निर्णयाशी काय संबध?, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
‘नीट‘च्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पालकांच्या प्रतिनिधींना घेऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी ‘नीट‘च्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.