सामनावर बंदीची मागणी चुकीची – व्यंकय्या नायडूंचा पक्षाला घरचा आहेर

0
10

पुणे, दि. १७ – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ‘ मात्र ही मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये’ असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री वैकंय्या नायडू यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला. ‘ सामना पेपरवर बंदी घालण्याची भाजपा कार्यकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये. त्यांना मोदींविरोधात जे लिहायचे ते लिहू द्यावे, अखेर जनता निर्णय घेईल’ असे नायडू यांनी म्हटले.
राज्यात सुरु असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना पेपरवर ३ दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर नायडू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. भाजप व शिवसेना राज्यात एकत्र सत्तेवर असताना महापालिका निवडणूक प्रचारामध्ये एकमेकांविरोधात अयोग्य भाषेत टीका करणेही चुकीचे असल्याचे नायडू यांनी यावेळी स्पष्ट केले.