नागपूर,दि.11(विशेष प्रतिनिधी- नागपुरात आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात तसेच विधानभवनाच्या बाहेर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळतो आहे. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळी, हमीभाव यांसारख्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सोमवारी सकाळी विधानभवनाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है! अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीवर चर्चा घ्यावी व बोंडअळीने पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर विधानभवनात जोरदार गदारोळ सुरू झाला. विखे-पाटील यांनी सोबत 100 रूपयांचा स्टॅम्प पेपर आणला होता. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या योजनेमध्ये 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, हे मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळी ने नुकसान झालेले कापसाचे बोंडाचं असलेले पाकीट सोपवले व हात जोडत मदत जाहीर करण्याची मागणी केली
– नागपूरच्या अधिवेशनात लॉबीत आमदारांच्या पीएला प्रवेशबंदी, विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंतचं प्रवेश
– विधानभवनाच्या पायऱ्यांवरच पीएंना ताटकळत राहवे लागतेय
– अध्यक्षांच्या आदेशामुळे आमदारांच्या पीएमध्ये नाराजी
– आमदार अब्दुल सत्तार यांनीही घेतला आक्षेप