शरद यादव यांनी शनिवारी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यानंतर शरद यादव यांनी रात्री उशिरा भुजबळ यांची घरी जाऊन भेट घेतली. देशात सुरू असलेल्या संघवादी विचारांच्या सरकारमुळे सर्वसामान्य जनता, विविध उपेक्षित प्रवर्ग आपल्या अधिकारापासून दूर फेकले जात आहेत, असा आरोप यावेळी शरद यादव यांनी केला. या भेटीत यादव यांनी देशात ओबीसी आणि मराठा, जाट आदी समाजातील नेत्यांना टार्गेट कसे केले जात आहे, याचे अनेक दाखले दिले.
यादव-भुजबळ या दोन नेत्यांमध्ये देशाच्या आणि राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. त्यात यादव यांनी सांगितले की, देशातील चौकीदार म्हणून जनतेने ज्यांची निवड केली तो चौकीदार चोरांचा रखवालदार निघाला आहे. म्हणूनच सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून नीरव मोदी, मल्ल्यासारखे लोक देश सोडून पळाले. मात्र प्रामाणिक व ओबीसी-मागास अशा लोकांना सतावले जात आहे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. हे मोठे षड्यंत्र असून त्याचाच भाग म्हणून देशातील ओबीसी, मागासांना टार्गेट केले जात आहे, असा त्यांनी आरोप केला. आपल्या तब्येतेची काळजी घेत आता रस्त्यावर येऊन मुकाबला करण्यासाठी समोर यावे, असेही त्यांनी भुजबळांना आवाहन केले.
यादव-भुजबळ या दोन नेत्यांमध्ये देशाच्या आणि राज्यातील राजकारणावर चर्चा झाली. त्यात यादव यांनी सांगितले की, देशातील चौकीदार म्हणून जनतेने ज्यांची निवड केली तो चौकीदार चोरांचा रखवालदार निघाला आहे. म्हणूनच सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून नीरव मोदी, मल्ल्यासारखे लोक देश सोडून पळाले. मात्र प्रामाणिक व ओबीसी-मागास अशा लोकांना सतावले जात आहे. त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. हे मोठे षड्यंत्र असून त्याचाच भाग म्हणून देशातील ओबीसी, मागासांना टार्गेट केले जात आहे, असा त्यांनी आरोप केला. आपल्या तब्येतेची काळजी घेत आता रस्त्यावर येऊन मुकाबला करण्यासाठी समोर यावे, असेही त्यांनी भुजबळांना आवाहन केले.