भंडाèङ्मात होणार धानाच्या तणसापासून इथेनॉल,सीएनजी निर्मिती प्रकल्प-पालकमंत्री फुके

0
17

मुंबई,दि.17: पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया या धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकèयांना रोजगारासोबतच उद्योगाची साथ मिळावी आणि शेतातील धानाच्य तणसाला भाव मिळावा या उद्देशाने भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंगळवारच्या बैठकीत धानाच्या तणसापासून इथेनाल व सीएनजी प्रकल्प उभारण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेत या दोन्ही जिल्ह्याकरिता भंडारा एमआयडीसी परिसरात हा प्रकल्प उभारण्यावर संमती दर्शविण्यात आली.
या बैठकीला गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री साबावी, वने व आदिवासी विकास डॉ. परिणय फुके, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माजी आमदार शोभाताई फडणविस, भंडारा जिल्हाधिकारी शंतनू गोयल, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधीकारी अन्बलगन , मिलिंद पतके कार्यकारी संचालक(भारत पेटड्ढोलियम) हे उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पाला मकरधोकडा येथे जमीन उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला गेला. जिल्हाधिकारी यांनीं जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करून ती जमीन प्रकल्पास देण्याबाबत निर्णय घेतला. हा प्रकल्प १५०० कोटींचा असून १०० एकर जमीन लागणार आहे. भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी करणे व उपलब्ध करून देणे याबाबत सूचना देण्यात आल्या. बायो इथेनॉल निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. परिसरातील धान उत्पादक शेतकèयांना मोठा फायदा या प्रकल्पाद्वारे होणार असून या प्रक्लपाद्वारे १०,००० रोजगार निर्मिती सुध्दा होणार आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला यामुळे गती मिळणार असून परिणय फुके यांनी यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
या स्वरूपाचे भारतात १२ प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ४ प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. ३.८४ लाख टन तनस भंडारा जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यात ३.४६ लाख टन तनस उपलब्ध आहे. हे सर्व जाळल्या जात असून आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. तणसाची बांधणी करणे मशीनच्या सहाय्याने प्रेस करून बेल्स बनवणे यासारखे आनुषंगिक उद्योग सुद्धा उभे राहणार असल्याने स्थानिकांच्या रोजगारात भर पडणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक असे तंत्रज्ञान भारत पेटड्ढोलियम उपलब्ध करून देणार आहे. शेल व प्राज टेक्नॉलॉजी चा उपयोग करून इतरही कृषी व वने यातून उत्पन्न होणाèया वेस्ट पासून सुद्धा इथेनॉल निर्मित केल्यास इथेनॉल कमी किमतीत उपलब्ध होईलए तसेच भारतात पेटड्ढोल तथा डिझेलमध्ये इथेनॉल चे १० टक्के मिश्रण करण्याबाबत केंद्र शासनाचे धोरण आहे. सध्यास्थितीत भारतात एकूण पेटड्ढोल व डिेझेलमध्ये मिश्रण करण्यास १ टक्का सुध्दा इथेनॉल उपलब्ध नाही त्यामुळे अशा प्रकल्पाची देशाला गरज आहे अशी सूचना फुके यांनी केली.