भारतात आहेत 33 कोटी दुष्काळग्रस्त

0
14
नवी दिल्ली, दि. 19 – देशभरातील दुष्काळग्रस्तांची संख्या 33 कोटी असल्याचे केंद्र सरकाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. देशातल्या 10 राज्यांपैकी 256 जिल्ह्यांना दुष्काळाने ग्रासले असून तब्बल 33 कोटी लोकांना दुष्काळाची झळ बसल्याची माहिती केंद्राने दिली आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी या आर्थिक वर्षाचे लक्ष्य 38,500 कोटी रुपयांच्या वितरणाचे आहे. यापैकी आत्तापर्यंत 19,555 कोटी रुपये दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये वितरीत करण्यात आल्याची माहितीही केंद्र सरकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.