नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे

0
71
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीने फोडण्याचे साहस पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या छातीत व मनगटात आहे. मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याचे हेच महत्त्व आहे. दिल्लीतील त्यांचा शपथ सोहळा हा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखातून त्यांनी मोदींची स्तूती केली आहे. तसेच मोदी यांनी देशाच्या जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे. ते कालपर्यंत चौकीदार होते, पण आज ते पालक बनले असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संकटात येईल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. ज्यांनी ही भीती व्यक्त केली व आपली लढाई मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध असल्याची आरोळी ठोकली अशा मंडळींमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या असं ही उद्धव ठाकरे  यांनी म्हटलं आहे.