महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत ३७ लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या असून पुढे २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने ही अतिशय स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण पुढाकार आहे.
स्वरोजगार, स्वयं-सहाय्यता गट तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून त्यांना उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांचे आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण होण्यास मोठी मदत होईल.
– सीताबाई राहंगडाले,जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी





