फडणवीस सरकारला बाय करण्याची वेळ; काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

0
9
यवतमाळ,दि.17(विशेष प्रतिनिधी)-भाजप सरकारच्या काळात माणसाच्या जिवाला किंमत राहिली नाही, असे चित्र आहे. काँग्रेसने दोन वर्षांपूर्वीच कर्जमाफीची मागणी केली. राज्यात १३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. फसवणूक करणाऱ्या फडणवीस सरकारला बाय-बाय करण्याची वेळ आली असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.18 आॅक्टोंबरला कर्जमाफीची रक्कम जमा करणार म्हणणारे सरकार 19 तारखेला दिवाळीच्या सुट्टीच्या दिवशी शेतकरी कुठून पैसा काढणार हे मात्र विसरल्याची टिका सुध्दा केली.