आत्मसमर्पित नक्षलवादी बजावणार मतदानाचा हक्क

0
8

नागपूर – सामान्य नागरिकांप्रमाणेच गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनासुध्दा भारतीय लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व कळले आहे. त्यामुळेच बुलेट ऐवजी बॅलेटचा वापर करून गडचिरोलीतील आत्मसमर्पित नक्षलवादी येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाèया विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी गडचिरोली पोलिसांनी २५ आत्मसमर्पित नक्षल्यांना भारत निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र उपलब्ध करून दिले आहे. यात ४ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६२ आत्मसमर्पित नक्षल्यांनी मतदान केले होते.
राज्यात येत्या १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान होत आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असा फतवा नक्षल्यांनी काढल्यानंतर त्यांच्याच एकेकाळच्या सहका-यांनी नक्षल्यांना घरचा आहेर दिला आहे. बंदुकीच्या बळावर सशस्त्र क्रांतीची भाषा करणा-या आणि भारतीय राजसत्तेला आव्हान देणा-या नक्षल्यांना लोकशाहीचे महत्त्व कळले आहे. १५ – २० वर्षे नक्षल चळवळीत काम केल्यानंतर या चळवळीचा फोलपणा दलम सदस्यांच्या लक्षात आला आहे. राजसत्तेचे केवळ दिवास्वप्न दाखवून बंदूक आणि हिंसेच्या बळावर सामान्य आदिवासींची हत्या करण्यालाच या चळवळीने प्राधान्य दिले आहे. विचारहीन असलेल्या या चळवळीत होणारी कुचंबना, आरो१⁄२याच्या समस्या, सदैव भटकंती, अंतर्गत घुसमट आणि कायम मृत्युचे भय यामुळे मोठ्या संख्येने नक्षलवादी दलम सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.
एकीकडे आत्मसमर्पित नक्षलवादी लोकशाहीवर विेशास दाखवून मतदानात भाग घेत असताना सामान्य नागरिकांनीही नक्षल्यांच्या दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.