निवडणुकीतील अपयशामुळे विचलीत होऊ नका : राजेंद्र जैन

0
10

गोंदिया,दि.23 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुसाशित पार्टी आहे. राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने नेहमी सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या विकास आणि न्याय देण्याचे काम केले असून समोरही केले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील अपयशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी विचलीत होऊ नये, अपयशापासून धडा घेऊन आगामी निवडणुकीत यश कसे संपादन करता येईल, मोर्चेबांधणी करावी, असे मोलाचे मार्गदर्शन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जैन बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष अशोक सहारे होते. सभेला माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, मनोहर वालदे, मयूर जडेजा, सुशीला भालेराव, खालीद पठाण, प्रितपाल होरा, हेमंत पंधरे, राजेश कापसे, संदीप पटले, सौरभ जैस्वाल, रवी मुंदडा, मिनू बग्गा, विनायक खैरे, छोटू पंचबुध्दे, हरबक्ष गरनानी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जैन म्हणाले, निवडणुकीत जयपराभव होत राहतो. अशात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी खचून जाण्याचे काहीही कारण नाही. राष्ट्रवादी पक्ष अनुशासनवर चालतो. राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे धोरण नेहमी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राहिले आहे. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता आगामी निवडणुकीसाठी अधिक जोमाने कामाला लागा. पक्षाचे ध्येय धोरण समाज घटकांपर्यंत पोहोचवा, सर्वसामान्य समस्यांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घ्या, असेही त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांना आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक अशोक शहारे यांनी केले. संचालन महामंत्री राजेश दवे यांनी तर आभार विनित शहारे यांनी मानले. .