विशेष प्रतिनिधी
वायनाड (केरळ)दि. २८ – – दक्षिण आफ्रिका – अ संघाविरोधात चमकदार कामगिरी करून भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल विजयाचा शिलेदार ठरला आहे. त्याने सहा षटकांमध्ये एकही धाव न देता चार गडी बाद केले आहेत.
शुक्रवारच्या सामन्यात भारत- अ संघाने दक्षिण आफ्रिका – अ संघाला दुस-या कसोटीत 81 धावांनी पराभूत केले आहे. भारताने ही मालिका 1-0 ने नावावर केली आहे. पहिल्या डावात भारताने 157 धावा काढल्या. दुस-या डावात चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ पहिल्या सत्रात 76 धावांवर तंबूत परतला. या संघाचे पहिल्या फळीतील आठ फलंदाज वैयक्तिक दहा धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत.