टीम इंडियाचा बांगलादेशवर विजय

0
7

हैदराबाद दि. 13 –: विराट कोहलीच्या टीम इंडियानं हैदराबादच्या एकमेव कसोटीत बांगलादेशला 208 धावांनी हरवून, सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला.हैदराबादच्या मैदानात भारतानं बांगलादेशला विजयासाठी 459 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशला पाचव्या दिवशी 250 धावांपर्यंतच मजल मारता आली.भारताकडून आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 4 तर ईशांत शर्माने दोन विकेट घेत, बांगलादेशचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.तर या कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशनं चौथ्या दिवसअखेर तीन बाद 103 धावांची मजल मारली होती. त्यामुळं बांगलादेशला अखेरच्या दिवशी विजयासाठी 356 धावांची आवश्यकता होती तर भारताला विजयासाठी सात विकेट्स हव्या होत्या.बांगलादेशच्या फलंदाजांनी पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी झुंजवलं. पण अखेर बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला आणि टीम इंडियानं विजय साजरा केला.