मणिपूरः भूस्सखलनाने घेतला २० जणांचा बळी

0
11

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील जौमुल गावात मुसळधार पावसामुळे शनिवारी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २० जण ठार झाले आहेत.

चंडेल – मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळील जौमुल गावात मुसळधार पावसामुळे शनिवारी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २० जणांचा बळी गेला.या घटनेत अनेक घरे ढिगाऱ्यात दबली गेली.
या भागात बचाव व मदतकार्य वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.