ओडिशात नक्षलवादी हल्ल्यात 3 जवान हुतात्मा

0
6

वृत्तसंस्था
भुवनेश्वर दि. २६:- ओडिशातील मल्कानगिरी जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, सहा जवान जखमी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्याला लागून असलेल्या ओडिशातील मल्कानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा भागात आज सकाळी बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. बीएसएफच्या ताफ्याला लक्ष्य करून भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यानंतर अतिरिक्त दल घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यात 6 जवान जखमी झाले. घटनास्थळी अतिरीक्त कुमक रवाना करण्यात आली. बीएसएफचे महासंचालक डी. के. पाठक घटनास्थळी पोहोचले आहेत.छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्याला लागून हा भाग असल्याने येथे कायम नक्षलवाद्यांकडून कारवाया होत असतात. यापूर्वीही नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ले केले आहेत.