उद्यापासून दारू कंपन्यांचे ५० टक्के पाणी कापा – औरंगाबाद खंडपीठाचा आदेश

0
8
औरंगाबाद, दि. २६ – पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून राज्यभरातील दारू उद्योगांचे ५० टक्के पाणी कापा असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज  प्रशासनाला दिले. तर १० मे ते १० जून या काळात ही कपात ६० टक्के असेल तर सर्वसामान्य उद्योगांची पाणीकपात २५ टक्के इतकी असेल.
या पाण्याचे नियोजन विभागीय आयुक्तांनी करावे तसेच जिल्हाधिका-यांनी त्यावर देखरेख करावी. याचा अहवाल दर आठवड्याला उच्च न्यायालयाचे प्रबंधक आणि सरकारी वकिलांना द्यावा, असा आदेशही खंडपीठाने दिला. या कपातीतून वाचलेले पाणी पिण्यासाठीच वापरावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. याची पुढील सुनावणी १० जून रोजी होईल.