कोल्हापूरनजीक झालेल्या बस अपघातात 13 ठार

0
10

कोल्हापूर / वाकड,दि.27 – गणपती पुळ्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी मिनी ट्रॅव्हल्स कोल्हापूर येथील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून पंचगंगेच्या पात्रात कोसळली. या अपघातामध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या अंबडवेट , बालेवाडी आणि पिरंगुट येथील १६ प्रवाशांपैकी 13 जण जागीच ठार झाले असून ३ जखमी गंभीर जखमी झाले आहेत.  कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये हिंजवडीतील पत्रकार विजय वरखडे यांचे मोठे बंधू आणि दोन पुतण्या यांच्यासह अन्य नातेवाईकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. सदर वाहनातील प्रवासी हे पूणे जिल्हयातील बालेवाडी  व पिरंगुट येथील रहिवाशी आहेत.  सदर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 6 पुरुष व 7 स्त्रिया आणि 16 वर्षाखालील 7 मुला मुलींचा समावेश आहे.  तसेच सदर अपघातात 3 स्त्रियागंभिर जखमी आहेत.

संतोष बबनराव वरखडे (वय ४५), गौरी संतोष वरखडे (१६) ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (१४),वाहनचालक  महेश लक्ष्मण कुचेकरचाही (वय ३२),सचिन भरत केदारी 34 वर्षे, निलम सचिन केदारी 28 वर्षे, संस्कृती सचिन केदारी 8 वर्षे,सानिध्य सचिन केदारी 9 महिने,केदारी साहिल दिलीप14 वर्षे,भावना दिलीप केदारी 35 वर्षे,श्रावनी दिलीप केदारी 11वर्षे, छाया दिनेश नांगरे 41 वर्षे,प्रतिक दिनेश नांगरे 14 वर्षेयांचा मृतांमध्ये समावेश आहे.  विजय  वरखडे यांची भावजय मनिषा संतोष वरखडे (वय ३८, रा सर्वजण पिरंगुट) अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. जखमींंमध्ये मनिषा संतोष वरखडे 38 वर्षे,मंदा भरत केदारी 54 वर्षे आणि अन्य एकाचा समावेश आहे. यातील मृतांमध्ये संतोष वरखडे यांच्या सासरवाडीतील पाहुणे होते. जोडून आलेल्या सलग सुट्ट्यामुळे त्यांनी गणपतीपुळे ट्रिपचे आयोजन केले होते.

काही तरुणांनी ही घटना पाहताच नदी पात्राकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. या तरुणांमुळे तीन जणांचे प्राण वाचले. पहाटे तीन वाजेपर्यंत बचावकार्य सुरु ठेवत पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिनी ट्रॅव्हल्स वर काढली.