नव्या मुख्यमंत्र्यांची थकबाकीत कोटींची भर

0
8

मुंबई-पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्रिपदी असताना एप्रिल २०१४मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’सह अन्य मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाची ‘बेस्ट’च्या वीज बिलाची थकबाकी २९ लाख ९८ हजार ५२० रुपये होती. मात्र, मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यात वर्षभरात एक कोटी नऊ लाख रुपयांच्या थकीत रकमेची भर पडल्याचे आढळून आले आहे.

मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण असताना एप्रिल, २०१४मध्ये त्यांच्या बंगल्याचे थकीत बिल दोन लाख ६४ हजार ८८० रुपये होते. मात्र, फडणवीस यांचे सरकार राज्यात असून आता, मार्च २०१५पर्यंत थकीत बिल १३ लाख ९० हजार ८८० रुपये आहे. चालू बिल अवघे ११,३५५ रुपये आहे, तर थकीत बिलाची रक्कम १२ लाख ७७ हजार ३३३ रुपये असल्याने एकूण १३ लाख ९० हजार ८८० रुपये एवढे बिल भरणे आवश्यक आहे.