तिरोडा,दि.2: वृद्धाo्रमात जाण्याची पाळी ज्येष्ठ नागरिकांवर येऊ नये, यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन पिढय़ांचे विचार कधीकधी पटत नाही, तेव्हा आकस निर्माण होण्याची शक्यता असते, अशावेळी ज्येष्ठांनी समन्वय ठेवावा, देश घडविण्यात ज्येष्ठांचा मोलाचा वाटा असल्याचे विचार लायंन्स कल्ब अध्यक्षा ममता बैस यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संस्था,लायन्स क्लब,ह्युमन राईटसच्या संयुक्त विद्यमाने तिरोडा तालुक्यातील लोधीटोला येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी वृध्दांना फळ,ब्लँकेटसह औषधांचे वितरण करण्यात आले.यावेळी अॅड.माधुरी रहागंडाले,मंदा गाढवे,स्नेहा पारधी,इंदुताई वालदे,प्रीती आणि लायन्स क्लब व ह्युमन राईटसच्या सदस्या उपस्थित होत्या.