दयाराम कापगते यांचे मत :समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांचे

0
23

अर्जुनी मोरगाव दि.११ –समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असून पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. आधुनिक काळात पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी असून बंदुकीतून एकदा निघून गेलेली गोळी ज्याप्रमाणे परत घेता येत नाही. त्याचप्रमाणे पत्रकाराने वर्तमानपत्रात छापलेली बातमी असते. त्यामुळे पत्रकारांनी भान ठेऊन सत्याची शहनिशा करुनच लिखाण करावे, असे प्रतिपादन माजी आमदार दयाराम कापगते यांनी केले. ते नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात पत्रकारदिनी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
उद््घाटन प्राचार्य बलवीर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.उभापती अरविंद शिवणकर, डॉ. चेतन जाधव, सरपंच ल्ीाना डोंगरवार, उपसरपंच धर्मेश जायस्वाल, डॉ. बाबू कोसरकर, मुलचंद गुप्ता, शैलेश जायस्वाल, पं.स. अभियंता कचरे, राजकुमारसिंह गौतम, वासुदेव साधवानी, सतीश कोसरकर उपस्थित होते.
यावेळी दयाराम कापगते, पक्षितजज्ञ भीमसेन डोंगरवार, संतोष रोकडे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, प्राचार्य बलवीर, एस.एस. चव्हाण, समाजसेवक धनिराम नाकाडे, सुनील चांदुरकर, डॉ. नत्थू कोसरकर, प्रगतिशील शेतकरी योगराज हलमारे, शैलेष जायस्वाल, सतीश कोसरकर, बाबुलाल नेवारे, हिरासिंह गौतम, राधेश्याम भेंडारकर, डॉ. चेतन जाधव, सुरेंद्रकुमार ठवरे, संतोष बुकावन, राजकुमारसिंह गौतम, वासुदेव साधवानी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नवोदय विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी ईशा राऊत, आस्था बोरकर, प्रगती पवार, रुची रहांगडाले, हेमलता सिरसाटे, पूनम वटी यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्राने गौरविण्यात आले. संचालन करून प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर यांनी मांडले. आभार तालुकाध्यक्ष संतोष रोकडे यांनी मानले. यशस्वितेसाठी बाबुलाल नेवारे, हिरासिंह गौतम, एस.एस. चव्हाण, शामकुंवर, रामटेके यांनी सहकार्यकेले.