वेकोली प्रकल्पगचस्तांचा रस्तारोको, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

0
6

गडचांदुर,दि.26 :- वेकोलीत जमिन अधिग्रहित करताना शेतकयात भेदभाव करून त्यांच्यावर अन्याय होत आहे. मात्र या शेतकयांच्या पाठीशी शेतकरी संघटना ठामपणे उभी असून मागण्या पुर्ण न झाल्यास तिव्र असा आंदोलन  छेडण्याचा इशारा विदर्भवादी नेते तथा राजुराचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिला आहे. वेकोली प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय हक्क, योग्य मोबदला आणि नोकरी मिळावी, या मागणी साठी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोवनी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले.
राजुरा – कवठाळा मार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखुन धरल्याने शेकडो कोळशाचे वाहन अडकून पडले. शेवटी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.
गेल्या दिड महिन्या पासून पोवनी २ व ३, खाणीचे प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत आहे. परंतु त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत वेकोली प्रशासन, राज्य व केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाही. त्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देत शेतकरी संघटनेने रस्त रोको आंदोलन केले. पोवनी २ व ३ च्या खाणीचे उदघाटन एकाचवेळी झाले परंतु २, ला जो जमिनीचा दर मिळाला तो देण्यास वेकोलीने राज्य शासनाच्या सुधारीत परिपत्रकाचा आधार घेत नकार दिला.
यामुळे येथील शेतकयात संतापाची लाट उसळली दरम्यान काही लोकप्रतिनीधी खोटे आश्वासन देत असल्याने त्यांच्या विषयी अविश्वासाची भावना प्रकल्पग्रस्तात निर्माण झाली आहे. पोवनी २ प्रमाणे ३ ला ही जमिनीचा दर द्यावा कोलगाव, मनोली, सास्ती, भंडागपूर येथील जमिनीचा मोबदला व साखरी येथील उरलेली ३६, शेतकयांची जमिनी अधिग्रहीत करावी, विरूर (गाडेगाव) येथील राहिलेली १७ टक्के जमिन तातडीने अधिग्रहीत करावी, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व विजबील माफ करावे आदिंसह अनेक मागण्यांसाठी हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
उपविभागिय पोलिस अधिकारी, शेखर देशमुख व ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवले व आंदोलनात प्रभाकर दिवे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, मधुकर चिंचोलकर, कपिल इद्दे, निळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, स्वप्निल धोटे, दशरथ पाटील तांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला व पुरूष शेतकरी उपस्थित होते.