कंत्राटी एएनएमचे आजपासून ‘आमरण उपोषण’

0
7

गोंदिया दि.१६–: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून आज शनिवारपासून (दि.१६) आमरण उपोषण सुरू करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस निरीक्षकांना दिले.उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर आदिंचा समावेश आहे.
रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना अनेकदा देण्यात आले होते. मात्र तीन वर्षे लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही. या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएमनी अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. बेमुदत साखळी उपोषणही सुरू केले. दरम्यान पालकमंत्र्यांनी मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. परंतु त्यांनी दिलेले आश्वासनही हवेतच विरल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी शनिवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या चकरा मारत त्यांनी जि.प. पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले.