33.2 C
Gondiā
Wednesday, May 14, 2025
Home Blog Page 4

485 ग्रॅम गांजासह आरोपीस अटक

0

सालेकसा,दि.१२ः येथील पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या तेलीटोला येथे अवैधरित्या गांजा साठवून ठेवणाऱ्या एका 65 वर्षीय इसमाकडून 485 ग्रॅम ओलसर हिरवट गांजा जप्त करुन सालेकसा पोलिसांनी अटक केली आहे.या गांजाची एकूण बाजारभावाने किंमत सुमारे ₹9,700/- असल्याचे पोलिसांनी सांगितले. शंकर हिरामन लांजेवार (रा. तेलीटोला, ता. सालेकसा, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन दिनांक 11 मे 2025 रोजी दुपारी 1:06 ते सायंकाळी 5:30 दरम्यान आरोपीच्या घरी झडती घेतली. या दरम्यान आरोपीच्या पलंगाच्या गादीखाली लपवून ठेवलेला गांजा सापडला.

जप्त केलेला मुद्देमाल:193 ग्रॅम ओलसर हिरवट पाला – किंमत ₹3,860/- 292 ग्रॅम बी मिश्रीत पाला – किंमत ₹5,840/-(प्रति किलो ₹20,000/- प्रमाणे एकूण वजन: 485 ग्रॅम) झडतीदरम्यान मिळालेला गांजा पंचासमक्ष जप्त करून त्याचे नमुने केमिकल अनालिसिस (सी.ए.) साठी वेगळे करण्यात आले. उर्वरित माल घटनास्थळीच सिलबंद करण्यात आला असून, आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 अंतर्गत कलम 8, 20(अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, व डी.वाय.एस.पी प्रमोद मडामे (आमगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाहीत सपोनी युवराज पोठरे, पो.ह. गणेश सोनजाल, तुरकर, पो.शि. वेदक, रामप्रसाद मेंढके, जितेंद्र पगारवार, मनोहर कांबळे, विकास हेमने तसेच महिला पोलीस छबु भेदे यांचा सहभाग होता.

महाबोधी विहार मुक्तीसाठी बुध्द पोर्णीमेपासुन धम्मगर्जना

0

सडक अर्जुनी,दि.१२ः बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बिहार येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या संपूर्ण ताब्यात यावे आणि बी. टी. अॅक्ट रद्द व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील बौद्ध विहार समित्यांनी ठराव संमत करावे.आणि जनजागृती करून आंदोलनास सुरुवात करावी, असे आवाहन आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.

या बैठकीत त्यांनी “महाबोधी विहारावर आजही बौद्धांचे संपूर्ण अधिकार नाहीत. हे बौद्ध समाजाच्या अस्मितेचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. B.T. Act ही ब्रिटिशकालीन व्यवस्था बौद्धांच्या अधिकारांवर अन्याय करते, ती त्वरित रद्द झाली पाहिजे.” असे सांगितले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त विहारातून निघणाऱ्या रॅलीत, “बच्चा बच्चा भीम का – महाबोधी के काम का!” अशी घोषणा देऊन जनजागृती करण्यात यावी. या आंदोलनाचे रूप सायंकाळच्या धम्मसभांमध्ये भाषणांद्वारेही साकार करावे, असे ते म्हणाले.बैठकिला राजकुमार बडोले फाउंडेशनचे राकेश भास्कर, प्रशांत शहारे,अ‍ॅड. मयूर रामटेके, मिथुन टेंभुर्णे, माजी सभापती विश्वजीत डोंगरे,राजेश नंदागवळी,यावेळी जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समिती सदस्या वर्षाताई शहारे, अर्जुनी मोरगाव नगर पंचायत नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका शारदाताई बडोले, लक्ष्मीकांत धानगाये, मीनाताई शहारे, दीपंकरजी उके, तथागत राऊत, डीलेश सोनटक्के, व मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.

विदर्भातील पहिला “बलून बंधारा” निर्माण होणार गोंदियातील बाघ नदीवर, १०९ कोटी रुपये मंजूर

0

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेला मिळणार नवे जीवन, १० हजार एकर जमीन होणार सिंचनाखाली

गोंदिया. (१२ मे)  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नदीचे पाणी अडविण्यासाठी आणि हे पाणी सिंचनासाठी वापरण्यासाठी, आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून रजेगाव येथे बाघ नदीवर नवीन प्रकारचा बलून धरण बांधण्यात येणार आहे. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी सरकारला केली विनंती वरुन जलसंपदा विभागाकडून १०९ कोटी रुपये मंजूर झाले आहे.

अमेरिका आणि चीनच्या तंत्रज्ञानावर आधारित, गोंदिया तहसीलमधील रजेगाव बाघ नदीवर हा बलून बंधारा बांधला जाणार आहे ज्यामुळे रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेला नवीन जीवन मिळेल. भारतात, जळगावमधील गिरणा नदीवर प्रथम प्रायोगिक तत्वावर बलून बैराज बांधण्यात आले, त्यानंतर ते अनेक नद्यांवर बांधण्यात आले, परंतु विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात ते पहिल्यांदाच बांधले जात आहे.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, अनेक वर्षापूर्वी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना करण्यात आली होती परंतु पाणी साठवणुकीअभावी ही योजना बंद अवस्थेत पडून आहे आणि आतापर्यंत ती सिंचनासाठी वापरता आलेली नाही. परंतु आम्ही वारंवार सरकारला रजेगाव बाघ नदीवर बंधारा बांधण्याची विनंती केली, ज्यासाठी सरकारने आम्हाला १०९ कोटी रुपये खर्चाचा बलून धरण दिले आहे.

आमदार विनोद अग्रवाल पुढे म्हणाले, हे बलून बॅरेज अमेरिका आणि चीनच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे धरण हवेच्या दाबाने स्वयंचलितपणे चालेल आणि ते बलून सेन्सर तंत्रज्ञानाने काम करेल. ते बुलेटप्रूफ असेल आणि तळाशी असलेल्या पातळीपर्यंत ३ मीटर पाणी साठवेल.

ते पुढे म्हणाले, २५ ते ४० फूट वाळू उरल्यानंतर, त्याखाली सिमेंट काँक्रीट टाकले जाईल ज्यावर ते उभे राहील. बलून धरणातील पाणी साचल्याने सुमारे १० हजार एकर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हे काम लवकरच सुरू करण्याबाबत विदर्भ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.

आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे, 395 कोटी रुपये खर्चाचा महत्त्वाकांक्षी डांगोर्ली बॅरेज मंजूर करण्यात आला हे उल्लेखनीय आहे. वैनगंगा नदीवरील ३९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे, ज्याचे काम देखील सुरुवातीच्या टप्प्यात आहे. नदीतील पाणी थांबवल्याने ग्रामीण भाग आणि शहरांना २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल, तर सुमारे ५८६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होईल. येत्या काळात, गोंदिया तहसील पाण्याच्या टंचाईपासून मुक्त होईल आणि शेते आणि कोठारे हिरवीगार होतील असे विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

0

रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. रायपूर-बालोदाबाजार मार्गावर सरागांवजवळ रविवारी रात्री उशिरा एक ट्रक आणि ट्रेलर यांच्यात टक्कर झाली. या अपघातात कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरवयीन तर ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.या ट्रेलरमधून लोक बाळाच्या सहा महिन्याच्या कार्यक्रमावरून परतत होते. मत्यू पावलेले हे सर्व लोक छत्तीसगडच्या चटौद गावाचे निवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते.

रायपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात त्यावेळेस झाला जेव्हा हे सगळे लोक कार्यक्रमावरून परतत होते. जखमींना उपचारासाठी रायपूरच्या डॉ. बी. आर. आंबेडकर मेमोरियल रुग्णालय आणि खरसोरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.

न्यू सेल्फिन डिफेन्स अकॅडमी तिरोडा यांनी जिंकले गोंदिया डिस्ट्रिक्ट किकबॉक्सिंग स्पर्धेत ६ सुवर्ण व १ कांस्यपदक

0

चित्रा कापसे/तिरोडा —गोंदिया डिस्टिक किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५- २६ चे आयोजन अम्युचर किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ गोंदिया ईगल किक बॉक्सिंग एकेडमी द्वारा के.के इंग्लिश प्राइमरी स्कूल आमगाव येथे रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते यात तिरोडा तालुक्यातील न्यू सेल्फिन अकॅडमी तिरोडा येथिल ७ विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी स्पर्धेमधे ६ सुवर्ण व १ कास्य पदके जिंकून बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड़ करण्यात आली, यामध्ये
सुवर्ण पदक कु.सलोनी ऊईके ,कु.वंशिका येसने ,कु. सौम्या मानकर ,लेखनी पारधी , निष्ठा जगने ,श्रावणी साठवने यांनी जिंकले असून त्यांनी आपला यशाचे श्रेय तिरोड़याचे एकमेव अधिकृत मुख्य प्रशिक्षक चंद्रप्रकाश प्रजापति,आकाश शहारे याना दिले असून या यशाकरिता आमदार विजय राहंगडाले ,माजी सभापती न.प.अशोक असाटी,राजेश असाटी पब्लिक स्कूल चे संस्थापक राधाकृष्ण शेंडे,ग्लोरियस माउंट एकेडमी चे संस्थापक विलास नागदेवे, दीपक घरजारे,विकेश मेश्राम,अमन नंदेश्वर,राजेश वरठे,अतुल बिंझाडे,कु निशारानी पांडे व पालकांनी भविष्याच्या प्रगती साठी शुभेच्छा दिल्या.

१२ मे जागतिक परिचारिका दिन,आरोग्य सेविकांच्या कार्याला सलाम

0

गोंदिया,दि.१२ः जागतिक स्तरावर आपण अनेक वेगवेगळे दिन साजरे करत असतो. त्याच पद्धतीने निःस्वार्थपणे रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्म १२ मे रोजी झाला होता. त्यामुळे याच दिवशी म्हणजे १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये तो दिवस ‘जागतिक परिचारिका दिन म्हणून घोषित करण्यात
आला.इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जात असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,एक के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय,एक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय,एक तिरोडा उपजिल्हा रुग्णालय,दहा ग्रामीण रुग्णालय, 45 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,263 आरोग्यर्धिनी उपकेंद्र,4 आपला दवाखाना,17 नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व यापाठोपाठ खाजगी रुग्णालयातुन लोकांवर आरोग्य उपचार दिले जात असल्याची माहीती डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
वास्तवात एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवणे जितके गरजेचे आहे, तितकीच त्याची काळजी घेणेसुद्धा गरजेचे असते. रुग्णालयात डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवितात; परंतु या शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचारांनंतर त्या रुग्णाची सेवा शश्रूषा करण्याचे काम परिचारिका करीत असतात. उपचारांसोबतच रुग्णाला मानसिक आधार, त्याचे पथ्यपाणी सांभाळणेदेखील तितकंच गरजेचं असतं आणि हेच काम परिचारिका पार पाडतात. अगदी ऑपरेशन थिएटरपासून ते जनरल वॉर्डमध्ये रुग्णाला शिफ्ट करीपर्यंत नर्स कायम त्यांच्यासोबत असतात, त्यांची काळजी घेत असतात.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेविका ग्रामीण भागातील नागरिकांना 24 तास अहो दिवस रात्र हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, कुटुंबकल्याण, माता व बालआरोग्य, सिकलसेल, आदी विविध आजारांबाबत लोकांना प्रतिबंधात्मक आरोग्यशिक्षण व गृहभेटीदरम्यान उपचारात्मक आरोग्यसेवा देत आहेत.शासनाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री मातृवंदन, जननी सुरक्षा,जननी शिशु सुरक्षा,मानव विकास,नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना, आयुष्मान भारत योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवीत आहे.लसीकरण सत्रातून बालक व गरोदर मातांना लसीकरण व आरोग्यसेवा देत आहेत.संस्थास्तरावर सामान्य प्रसुती सोबतच आरोग्यविषयक माहिती त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून त्यावर उपचार करण्याचा सल्ला देत आहे.
त्यांच्या ह्या आरोग्य समाजसेवेच्या कामामुळेच शासनामार्फत जिल्हा स्तरावर आरोग्य परिचारिकांना आधुनिक परिचर्याचे जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल हा पुरस्कार देवुन दरवर्षी गौरविण्यात येत असतो हा पुरस्कार आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका, स्टाफ नर्स अशा विविध प्रवर्गातुन देत असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी दिली आहे.

जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर पोहचले नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात

0

गोंदिया-जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १० मे रोजी रात्रीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देत पाहणी केली.नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत देत असलेल्या आरोग्य सेवाची पाहणी करुन जनसामान्य,गोरगरीब,शेतमजुर व मोलमजुरी करणार्या नागरिकांना गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी व कार्यरत कर्मचार्यांना दिले.आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांचे मोबाईल क्रमांक याची नोंद ठेवुन फालोअप ठेवण्याचे सुचित केले.ह्या वेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ.अजिंक्य आंबेडारे,आरोग्य सेवक नेपाल नारनवरे,स्टाफ नर्स कल्याणी मंडरेले,परिचर हशीला वैद्य उपस्थित होते.जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त,अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांनी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात लोकांनी प्राथमिक उपचार व मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी अर्जुनी मोरगाव वासियांना केले आहे.

भाविकांवर काळाचा घाला;मिनी ट्रॅव्हल्स-ट्रकचा भीषण अपघात;३ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी

0

सातारा:- सातारा जिल्ह्यातील लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. सातारा-लोणंद मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एम एच 04 सीपी 2452) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती.

ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे चा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम एच 42 बीएफ 77 84) हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले .याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते .पुढील तपास सातारा पोलिस सुशील भोसले करीत आहेत.

बाई गंगाबाई ब्लड बँकेत त्वरित ब्लड कंपोनंट युनिट सुरू करा

0

– अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल”

गोंदिया, दिनांक १२–गोंदिया मेडिकल कॉलेजच्या बाई गंगाबाई ब्लड बँकेत अद्याप ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट कार्यान्वित करण्यात आलेली नाही. या महत्त्वाच्या सुविधेच्या अभावामुळे थॅलेसीमिया आणि सिकलसेल अशा गंभीर आजारांनी ग्रस्त निरागस मुलांना वेळेवर प्लाझ्मा, पीआरसी, प्लेटलेट्स अशा आवश्यक रक्तघटकांचा पुरवठा होऊ शकत नाही.

या जनहिताच्या विषयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले रक्तमित्र  विनोद चांदवानी ‘गुड्डू’ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर बाई गंगाबाई ब्लड बँकेत ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू झाले नाही, तर थॅलेसीमिया ग्रस्त बालकांचे पालक आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासह मिळून गोंदिया मेडिकल कॉलेजच्या डीन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

पडोसी भंडारा जिल्ह्यात, जिथे रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे, तिथे ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र गोंदियात, जिथे आरोग्यसेवा आणि रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि मध्यप्रदेश व छत्तीसगड या सीमाभागांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात, अशा ठिकाणी ही युनिट अद्याप सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

मध्यमवर्गीय रुग्णांना ब्लड कंपोनंटची गरज भासल्यास त्यांना खासगी ब्लड बँकांमधून महागात रक्तघटक खरेदी करावे लागतात, त्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझे वाढते आहे.

प्रशासनाकडे जनहितार्थ मागणी करण्यात येते की, बाई गंगाबाई ब्लड बँकेत तातडीने ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू करण्यात यावे, अन्यथा उग्र जनआंदोलन करण्यात येईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.

जेसीआई सीनियर सिटीजन वॉकथान सम्पन्न

0

गोंदिया: जेसीआई एल्युमिनी क्लब द्वारा रविवार को सुभाष गार्डन में आयोजित *वरिष्ठ नागरिक वॉकथॉन* का आयोजन सफलतापूर्वक सम्पन्न हुआ। वॉकथॉन में बड़ी संख्या मे वरिष्ठ नागरिकगण सम्मिलित हुए।

कार्यक्रम के मुख्य अतिथि पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष जेसी पुरुषोत्तम मोदी थे, जिन्होंने उपस्थित प्रतिभागियों का उत्साहवर्धन किया और वॉकथॉन विजेताओं को पुरस्कार वितरित कर सम्मानित किया।

पुरुष वर्ग में दामोदर बडवाईक, पी. डी. पानसे, चंद्रकांत गौतम, किशोर होतचंदानी व महिला वर्ग में श्रीमती कुसुम जायसवाल, श्रीमती साधना अरोड़ा विजयी रहे. सर्वश्री के.डी. अरोड़ा, अक्षय जैन, पदम लनिया, सतीश रायकवार, डॉ. बाबूलाल चौधरी, सतीश रायकवार, पुरुषोत्तम बावनकर, खैमराज गौड़े, पुरुषोत्तम भेलावे, राजेंद्र सातभाई इत्यादि वरिष्ठ नागरिकगण प्रमुखता से वॉकथॉन मे सहभागी हुए.
वरिष्ठ नागरिक  के.डी. अरोड़ा ने अपनी शानदार मिमिक्री से उपस्थितो को खूब हसाया.जेसीआई एल्युमनी क्लब की आँचल उपाध्यक्षा ऐड. कीर्ति आहूजा की प्रमुख उपस्थिति मे सम्पन्न इस
कार्यक्रम का संचालन जेसी वासुदेव रामटेककर नें, प्रस्तावना जेसी भूमी वतवानी व आभार जेसी सारिका ढोमने नें माना.
वॉकथॉन की सफलता हेतु बलवान ग्रुप के प्रशिक्षक श्री योगेश डोडवानी, वरिष्ठ नागरिक  नरेश खेता, मुन्ना उपाध्याय, शंकर सोनी, पंकज शिवनकर, श्रीमती श्रद्धा बोरीकर, शंकर पाठक गार्डन के प्रभारी  महेश कठाने, कर्मचारी  सतीश गौर का विशेष योगदान रहा।