40.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5649

राज्यातील रुग्णालयातील कर्करोग उपचार विभाग सुसज्ज करा- सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई, दि. 28 : कर्करुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यासाठी
राज्यातील कर्करोग उपचार  विभाग सुसज्ज करावे, असे निर्देश वित्त व
नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
काल  मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण
मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा
गाडगीळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कर्करुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा व त्यासाठीची अत्याधुनिक
उपकरणे यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून श्री. मुनगंटीवार
म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय
महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांसाठी 10 वाहने उपलब्ध करून देण्यासाठी
वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा तसेच राज्यातील वैद्यकीय
महाविद्यालये व रुग्णालयांच्या गरजांचा एकत्रित प्रस्ताव तयार करून तो
शासनाकडे पाठविण्यात यावा.
 बैठकीत वित्तमंत्र्यांनी चंद्रपूर-गोंदिया येथील वैद्यकीय
महाविद्यालयातील पदनिर्मिती, पदभरतीची प्रकरणे तत्काळ मार्गी लावावीत,
नांदेड, यवतमाळ, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्राध्यापकांना 50 टक्के व्यवसायरोध भत्ता देण्यात येतो तो
चंद्रपूर-गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना मिळावा,
यासाठी प्रस्ताव पाठवून त्यास मंजूरी घेण्यात यावी, अशा सूचनाही केल्या.

प्रत्येक जिल्ह्याचा रोजगार व कौशल्य विकास आराखडा तयार करा- मुनगंटीवार

0

मुंबई, दि. 28 : प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये
आणि क्षमता लक्षात घेऊन जिल्ह्याचा रोजगार आणि कौशल्य विकास आराखडा तयार
करावा तसेच राज्यातील अधिकाधिक युवकांना स्वंयरोजगार सुरु करण्यासाठी
मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होईल यासाठी गांभीर्यपूर्वक प्रयत्न
करा, असे आदेश आज वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज मंत्रालयात वित्तमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, कौशल्य विकास आयुक्त विजय
वाघमारे, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या आर. विमला,
महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीच्या वतीने महाराष्ट्र बँकेचे अतूल जोशी
यांच्यासह इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुद्रा बँकेचा थेट संबंध रोजगाराशी निगडित असल्याने हा विषय अतिशय
महत्वाचा आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक
जिल्ह्याने त्यांच्या जिल्ह्यात किती युवक बेरोजगार आहेत,  जिल्ह्यात
किती बँका आहेत, त्यांच्या शाखा कुठे कुठे आहेत, जिल्ह्यात कोणता रोजगार
सुरु केला तर तो यशस्वी होऊ शकतो, जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेऊन
त्यांच्या गरजा कशाप्रकारच्या आहेत याचा अभ्यास करून एक आराखडा तयारा
करावा, जिल्ह्यातील उद्योग आणि कंपन्यांशी चर्चा करावी, त्यांना नेमके
कशाप्रकारचे मनुष्यबळ हवे हे लक्षात घेऊन युवकांच्या कौशल्य विकासाला
चालना द्यावी.
राज्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत या आर्थिक वर्षात वर्षी  31 ऑगस्ट 2016
अखेरपर्यंत 10 लाख ७० हजार २६९ खातेदारांना  शिशू, किशोर आणि तरूण
गटांतर्गत एकूण ४१२९.८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे.
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुक्यांचा समावेश होतो.
शिक्षण, आरोग्य आणि दरडोई उत्पन्न या तीन गोष्टींवर मानव विकास
निर्देशांक निश्चित केला जातो. मानव विकास निर्देशांक वाढवायचा असेल तर
तिथे कोणते रोजगार सुरु केले पाहिजेत याचे प्रस्ताव संबंधित
जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरीत पाठवावेत अशा सूचना ही त्यांनी दिल्या. मुद्रा
बँक योजनेमधून कृषी संलग्न उद्योगाना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना
कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही हे
लक्षात घेऊन मुद्रा योजनेचा व्यापक प्रचार व प्रसार करा, योजनेच्या
लाभार्थींच्या यशकथा प्रसिद्ध करा असे ही ते म्हणाले.
कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेचे कर्ज यांची सांगड घालून मुद्रा बँकेचा
लाभ राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत- युवकांपर्यत जाऊ द्या, ज्या ठिकाणी
प्रशिक्षण केंद्र आहेत, कौशल्य विकास केंद्र आहेत तिथे लक्ष केंद्रीत
करून विद्यार्थ्यांना मुद्रा बँक योजनेची माहिती द्या त्यामुळे युवकांना
प्रशिक्षणानंतर उद्योग सुरु करून रोजगार मिळवणे व त्यासाठी कर्ज मिळवणे
सुलभ होईल.  योजनेची अंमलबजावणी करतांना जिल्हास्तरावर येणाऱ्या अडचणी
लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बँकर्स समितीने आवश्यक त्या सुस्पष्ट सूचना
पुन्हा एकदा निर्गमित कराव्यात अशा सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या.

बैठकीत श्री. पोरवाल यांनी जिल्हानिहाय समित्यांची स्थापना, लाभधारकांची
संख्या, योजना राबविताना येणाऱ्या अडचणी, त्रूटी याचा आढावा घेतला.
योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते
म्हणाले.

जिल्हयातील ३७ आरोग्य संस्थांचा कायापालट ;जिल्हाधकारी डाॅ.सूर्यवंशीचा पुढाकार

0

खेमेंद्र कटरे

गोंदिया,berartimes.com दि.२८ : राज्याच्या पुर्वेकडील मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हयात कोणतेही मोठे उद्योग आज घडीला उपलब्ध नाही. जिल्हयातील जास्तीत जास्त जनता ग्रामीण भागात राहत असल्याने ग्रामीण जनतेला  आरोग्याच्या उत्कष्ट सेवा देण्यासाठी कायापालट या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३७ आरोग्य संस्थांनी कात टाकली आहे. कायापालट योजना राबविण्यासाठी जिल्हयातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या मदतीने योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून आरोग्य विभागाकडून चांगली सेवा मिळावी याकरीता जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २०१५ पासून कायापालट ही अभिनव योजना राबविण्यास खरी सुरवात झाली.गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळातील ही एक यशस्वी योजना ठरली आहे.

जिल्हयातील शहरातील व ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यात एक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, एक बाई गंगाबाई शासकीय महिला रुग्णालय, तिरोडा येथील एक उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय, चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचवीस आयुर्वेदिक दवाखाने आणि २३६ प्राथमिक उपकेंद्र कार्यरत आहेत. कायापालट योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय, ५ ग्रामीण रुग्णालय, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४ आयुर्वेदिक दवाखाने आणि ६ प्राथमिक उपकेंद्र अशा एकूण ३७ आरोग्य संस्थांनी कायापालट अंतर्गत बाह्य व अंतर्गत सुधारणा करुन रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयाकडे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची पाऊले आता कायापालटमुळे या शासकीय आरोग्य संस्थांकडे वळली आहे.unnamed-1

चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर लहान मुलांसाठी बालोद्यान विकसीत करण्यात आले आहे. चोपा, चान्ना/बाकटी व हिरडामाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वाचनाकरीता वर्तमानपत्रे, मासिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णांच्या तक्रारी ऐकण्याकरीता व त्या सोडविण्याकरीता तक्रारपेटी आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण कल्याण समिती, कार्यकारी मंडळ, सल्लागार समितीचे नामफलक लावण्यात आले आहे. तसेच जिल्हयातील महत्वाचे अधिकारी, रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी ,परिचारीका, वाहन चालक यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक व त्यांच्या सेवेची वेळ अशी माहिती असलेली कर्तव्यतालिका सुध्दा या आरोग्य केंद्रात लावण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या आरोग्य केंद्रात औषध भंडार उपलब्ध आहे. तसेच औषधांची वर्गवारी सुध्दा योग्य पध्दतीने करण्यात आली आहे. रुग्णालयात औषधी नोंदणीकरीता स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात आली आहे. चोपा व चान्ना/बाक्टी या दोन आरोग्य केंद्रात स्वतंत्र संगणक कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यास अदानी उद्योग समुहाने मदत केली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालटमुळे झालेला बदल व रुग्णांना मिळत असलेली चांगली सुविधा तसेच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व नातेवाईकांना मिळत असलेल्या सौजन्यशील वागणूकीमुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची पाऊले शासकीय आरोग्य संस्थेकडे वळत आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा कायापालट होत आहे. त्यामुळे आज आरोग्य संस्थांमध्ये रुग्‍णांची मोठया प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास कायापालट योजना महत्वपूर्ण ठरत आहे.
ग्रामीण भागातील काही रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याकरीता बाकडे नव्हते, तर काही रुग्णालयातील परीसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. इमारतीची रंगरंगोटी न केल्यामुळे इमारतीकडे बघताच उदासिनता दिसून येत होती. आरोग्य केंद्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची झाडे लावली नसायची, रुग्णालयाच्या नावाची पाटी देखील लहान अक्षरात असायची. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यविषयक योजनांची माहिती नसायची. डॉक्टर व कर्मचारी रुग्ण व नातेवाईकांशी आस्थेवाईकपणे बोलत नसल्यामुळे रुग्णाला नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत होते. परंतु मागीलवर्षी पासून सुरु झालेल्या कायापालट योजनेने ग्रामीण व शहरी भागातील काही आरोग्य संस्थांचा कायापालट होण्यास मदत झाली. पूर्वी गावातील शासकीय आरोग्य संस्थेतील असुविधेबाबतच्या तक्रारी ग्रामस्थ ग्रामसभेतून करायचे. मात्र वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहभागातून आरोग्य संस्थांचा खऱ्या अर्थाने कायापालट झाल्यामुळे पूर्वी तक्रार करणारेच आता आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावीत आहे. या योजनेला शहरी तसेच ग्रामिण भागातील जनतेचे भरपूर सहकार्य ‍मिळत आहे.
कायापालटमुळे रुग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, साफसफाई करण्यात आली. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ झाला. परिसरात झाडे लावण्यात आली. रुग्णालयातील वार्डाच्या खिडक्यांची फुटलेली काचेची तावदाने बदलण्यात आली. पडदे-बेडशीट नियमीत बदलण्यात येत आहे. पंखे दुरुस्त करण्यात आली. रुग्ण व नातेवाईकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी वॉटर प्युरीफायर, डासापासून प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या. रुग्णालयासाठी आवश्यक असलेले साहित्य जवळील रुग्णालयात अतिरिक्त असल्यास रुग्णालयातून मागवून घेण्यात आले. पुरेसा औषधसाठा उपलब्ध झाला. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णांना व नातेवाईकांना आरोग्यविषयक योजनांची माहिती देत आहेत. त्या योजनांचा प्रत्यक्षात लाभ सुध्दा रुग्णांना देण्यात येत आहे. रुग्णालयाचा परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवण्यात येत आहे आदि कामे करण्यासोबतच आरोग्य संस्थेत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची मुक्कामाच्या काळात गैरसोय होवू नये यासाठी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहे. रुग्णाला आंघोळीसाठी गरम पाणी सुध्दा उपलब्ध होत आहे. काही रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त व खाटाची संख्या कमी असल्याने रुग्णाला व नातेवाईकांना अशावेळी खाटांची संख्या व नविन गादया रुग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत.
आरोग्याच्या विविध योजना, जागरुकतेबाबत पोस्टर्स, बॅनर्स आरोग्य संस्थेच्या दर्शनी भागात लावून आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यात येत आहे, आरोग्य संस्थेत आठवडी स्वच्छतेचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. त्यानूसार आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता करण्यात येत असते. आरोग्य संस्थांमध्ये रात्रीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वीजपुरवठा नसल्यास सौर दिव्याची तसेच वॉल कंपाउंडची व्यवस्था, इमारतीची डागडूजी करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेतील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसण्याकरीता प्रतिक्षालय, स्वागत कक्ष व बसण्याकरीता खुर्च्यांची व्यवस्था, मनोरंजनासाठी दूरदर्शन संचाची व्यवस्था प्रतिक्षालयात करण्यात आली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात वैदकीय अधिकारी यांच्या कक्षात रुग्णाला तपासणी करीता टेबल व आवश्यक साधन सामुग्री, संस्थेचा नकाशा, तसेच मागील तीन वर्षाचा लेख जोगा याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत महिला वार्ड व पुरुष वार्ड अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसुती कक्षात रुग्णांच्या संख्येनुसार टेबल लावण्यात आले आहेत. रुग्णालयातील महिला वार्डात न्यू बॉनी बेबी कार्नर, ट्रे एल्बो, ऑपरेटेड ट्रप आहेत. या आरोग्य संस्थांमध्ये शस्त्रक्रिया कक्षात निर्जंतुकीकरण करण्या बाबतचे प्रोटोकॉल्स लावण्यात आले आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय नोंदवही, ऑटोक्लेव्ह नोंदवही, फ्युमीगेशन नोंदवही, शस्त्रक्रिया नोंदवही, स्वतंत्र काचेच्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत.

विदर्भवाद्यांनी नागपूर कराराची होळी केली

0
नागपूर,ता. २८ –  नागपूर कराराप्रमाणे  ६३ वर्षानंतरही विदर्भाला अद्यापही न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) बुधवारी नागपूर कराराची होळी करण्यात आली. विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक दिल्याने आता वेगळे राज्य घेऊनच राहू, असा संकल्प यावेळी विदर्भवाद्यांनी केला. यावेळी विविध विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे हे संस्थापकीय अध्यक्ष असलेल्या ‘विरा’तर्फे दुपारी १ वाजता संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. अणे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर होत असलेले हे पहिलेच आंदोलन ठरले हे विशेष.
पंडित जवाहरलाल नेहरू व यांच्या आग्रहाने २८ सप्टेंबर १९५३ रोजी महाराष्ट्र हे एकच मराठी भाषिक राज्य करण्याचा ‘नागपूर करार’ अस्तित्वात आला. नागपूर करारात विदर्भाच्या विकासाबाबत काही अटी होत्या. यात लोकसंख्येच्या प्रमाणात विकास निधी खर्च करणे, लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व शासकीय नोकºयांमध्ये संधी देणे व दरवर्षी राज्याचे शासन निश्चित कालावधीसाठी नागपुरात स्थानांतरित करून एक विधिमंडळीय अधिवेशन घेणे. यापैकी एक विधिमंडळ अधिवेशन नावापुरते घेण्याशिवाय एकही अट पाळली गेली नाही. सातत्याने नागपूर कराराचा गळा कापला गेला. याचा परिणाम म्हणजे विदर्भाच्या लोकांच्या नशिबी बेरोजगार, स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या आल्या. या नागपूर कराराला २८ सप्टेंबर रोजी ६३ वर्षे पूर्ण झाली. या कराराचा सातत्याने भंग झाल्याच्या निषेधार्थ विदर्भवादी कार्यकर्ते एकत्र आले होते.

जवानांसाठी पाकला धूळ चारणार: हॉकी संघ

0

बंगळूर (वृत्तसंस्था) : ‘हॉकीमध्ये पाकिस्तानला धूळ चारून उरीतील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली देऊ‘ असा निर्धार भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेश याने आज (बुधवार) व्यक्त केला. पुढील महिन्यात मलेशियामध्ये आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत 23 ऑक्‍टोबर रोजी भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. 

श्रीजेशने थेट उरी हल्ल्याचा उल्लेख केला नाही; मात्र ‘पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारून आम्ही आमच्या जवानांना निराश करणार नाही‘ असे उद्गार काढले. उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान हुतात्मा झाले. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताने आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. 

पुढील महिन्यात 20 ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. यात साखळी फेरीत 23 ऑक्‍टोबर रोजी भारत-पाकिस्तान लढत होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. 

शेंगदाणे खाल्ल्याने बिघडली आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची प्रकृती

0

गडचिरोली, दि.२८: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर आज प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या आश्रमशाळेला भेट दिली. यावेळी करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत आणखी चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीने ग्रासल्याचे निदर्शनास आले, तर काल गडचिरोलीला रेफर करण्यात आलेल्या आशिक हिडामी या विद्यार्थ्याने एकाच दिवशी दीड किलो शेंगदाणे खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचेही तपासणीत निष्पन्न झाले आहे.

सोमवारी येरमागडच्या आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिकणारा राजमू बुधकर धुर्वे(१४) रा.कटेझरी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अलीराम जयराम तुमरेटी यास गडचिरोलीला हलविण्यात आले होते. त्याला सर्पदंश झाल्याचे निदान झाल्यानंतर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला अँटीडोज देऊन नागपूरला हलविले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पुन्हा आशिक हिडामी या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही काल(ता.२७) गडचिरोलीला आणण्यात आले. या सर्व प्रकारानंतर आज आदिवासी विकास विभागाचे गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. या तपासणीत ममिता माधव होळी, अशवंती मधुकर पोरेटी, करिना आनंदराव मडकाम व रुपाली यशवंत कुमरे या चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, काल गडचिरोलीला रेफर करण्यात आलेला विद्यार्थी आशिक हिडामी याने एकाच दिवशी तब्बल दीड किलो शेंगदाणे खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली, असे तपासणीत कळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुराम यांनी केली आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

0

देवरी,दि.28 : देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पडलेले छत आणि आरोग्यविषयक इतर सुविधांसंदर्भात आ.संजय पुराम यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली.सन १९९0 साली देवरी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली तेव्हापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कुठलीही सुधारणा झाली. एवढेच नाही तर बदलत्या काळानुसार रुग्णसोयीसाठी शासनाने नवीन उपकरणांची व्यवस्था केली, परंतु त्याला हाताळणारे चालक (ऑपरेटर) मात्र अजुनही या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सदर उपकरणांचा रुग्णांना पाहिजे तेवढी मदत होत नाही. याबाबत क्षेत्राचे आ.पुराम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री सावंत यांच्याशी यापूर्वीही चर्चा करीत पाठपुरावा केला.परंतु अजुनपर्यंत शासनाने प्रशासनाला कुठलेही निर्देश दिले नाही. उलट दिवसेंदिवस देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे छताचे पापुद्रे खाली पडत असल्याने यातून अपघात होऊ शकतो, ही बाब सोमवारी ना.सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.
देवरीत नवीन इमारत व उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा लवकरात लवकर मंजुर करण्यात यावा, असे स्मरणपत्र देण्यात आले. ना.सावंत यांनी विभागीय आरोग्य संचालक नागपूर व जिल्हा शल्य चिकीत्सक गोंदिया यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून प्रस्ताव सादर करून त्यांना तसा अहवाल सादर करा असे निर्देश दिले.

गोंदिया-भंडारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघटकपदी जिवन लंजे

0

berartimes.com
गोंदिया,दि.२८- येथील मयूर लॉन येथे पार पडलेल्या गोंदिया-भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते,कलावंत व शेतकरी जिवन लंजे यांची गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे संघटक म्हणून निवड करण्यात आली.येत्या ८ डिसेंबरला नागपूर विधानसभा अधिवेशनादरम्यान होऊ घातलेल्या ओबीसी महामोच्र्याचा प्रसारासह संघटन बांधणीसाठी लंजे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केली.पुर्व विदर्भातील कोहळी समाजाचे प्रतिनिधीत्व लंजे यांच्या माध्यमातून ओबीसी महासंघाला मिळाल्याने या समाजातही ओबीसीबद्दल जनजागृती करण्यात मदत होणार असल्याचे तायवाडे यांनी म्हटले आहे.लंजे यांच्या निवडीबद्दल सचिन राजुरकर,शरद वानखेडे,बबलू कटरे,खेमेंद्र कटरे,अमर वराडे,कैलास भेलावे,दुलीचंद बुध्दे,विनोद चौधरी,मनोज मेंढे,विलास चव्हाण,प्रमोद लांजेवार,रेखलाल टेंभरे आदीं ओबीसी संघर्ष समिती व महासंघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

नागपूर करार: मांडलिकत्वाचा दस्तऐवज-अविनाश पाठक

0

berartimes.com,नागपूर,दि.28- विदर्भाला समाविष्ट करून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ज्या नागपूर करारामुळे पूर्णत्वास गेली तो करार विदर्भासाठी कुचकामी ठरला आहे. विदर्भाशी गोडीगुलाबीने केलेल्या या कराराला महाराष्ट्राच्या नेत्यांनी नंतर केराच्या टोपलीत फेकून दिल्याने विदर्भाच्या वाट्याला अन्याय,अनुशेष, आत्महत्या, बेरोजगारी व भारनियमानासारख्या समस्या कायम स्वरूपी आल्या आहेत.
विदर्भ संयुक्त महाराष्टात समाविष्ट व्हावा, म्हणून तत्कालीन राजकीय नेतृत्वाने २८ सप्टेंबर १९५३ रोजी केलेल्या नागपूर कराराला आता ६० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, या करारातील बहुसंख्य कलमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याऐवजी तो मोडीत काढण्याचेच धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबिल्यामुळे विदर्भाची पार दैनावस्था झाली आहे. ऐतिहासिक काळापासून स्वतंत्र अस्तित्व राखून असलेल्या या प्रदेशाला आज संयुक्त महाराष्टात वसाहतीचे स्वरूप आले आहे.
महाराष्टÑात समाविष्ट होताना विदर्भाला सर्व क्षेत्रात झुकने माप दिले जाईल, नागपूरला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदोपत्री नव्हे तर वास्तवात दिला जाईल, आणि विदर्भाचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ठोस आश्वासने
नागपूर करारातून दिली गेली होती. या आश्वासनानंतर नेत्यांनी संयुक्त महाराष्टाचा प्रयोग स्वीकारला होता.या नागपूर कराराबाबत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हा दिलेला गर्भित इशारा आज पूर्णत खरा ठरला आहे. तेव्हा डॉ.बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘राजकीय करार कचर्याच्या टोपलीत फेकण्याच्या लायकीचे असतात ते कधीच पूर्ण होत नसतात, म्हणून असल्या करारांवर विश्वास न ठेवता वैदर्भीय जनतेने विदर्भाचे वेगळे राज्य मागणेच त्यांच्या हिताचे
आहे. करार मदार करून महाराष्टाचे मांडलिक होण्यापेक्षा विदर्भातील जनतने स्वतंत्र विदर्भाचे मालक बनले पाहिजे.’’मराठी भाषिकांचे एकच विशाल महाराष्ट राज्य निर्माण न करता महाराष्टाची चार राज्यात विभागणी करावी, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५३ च्या राज्य पुनर्रचना आयोगाकडे मांडली होती. महाराष्ट नगर राज्य (मुंबई), पश्चिम महाराष्ट, मध्य महाराष्ट (मराठवाडा) व पूर्व महाराष्ट(विदर्भ) अशी ही नवीन राज्ये असावीत, असे त्यांचे मत होते. राज्य
पुनर्रचना आयोगाने विदर्भ राज्याची शिफारस आधीच केली असल्याने विदर्भाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्यात यावे, असे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. ते म्हणतात, मी नमूद केलेल्या महाराष्ट्च्या अन्य तीन भागांपेक्षा पूर्व महाराष्ट्र (विदर्भ) हे पूर्वीच वेगळे राज्य असून त्याचे वेगळे राज्यच राहू द्यावे, कारण विदर्भाची सुव्यवस्थित प्रशासन,राजस्व व न्याय व्यवस्था आहे आणि हा विभाग हिंदी राज्याच्या बंधनातून मुक्त झालेला आहे. सर्वच मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, या मतास त्यांच्या विरोध होता. मराठी भाषिकांचे कधी एक राज्य नव्हते असे डॉ.बाबासाहेबांनी ऐतिहासिक दाखले देऊन स्पष्ट केले आहे.महाराष्ट्राचे व विदर्भाचे कधीही एक राज्य अथवा एक राष्ट्र नव्हते, हे इतिहासावरून सिद्ध होते. पुरातन इतिहास पासून अर्वाचिन इतिहासापर्यंत पदोपदी याच्या नोंदी सापडतात. मानववंशशास्त्राच्या अभ्यासिका डॉ. ईरावती कर्वे यांनी आपल्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या प्रसिद्ध ग्रंथात महाराष्ट व विदर्भ कधीही एक राज्य वा राष्ट नव्हते, असे स्पष्ट केले
आहे. विदर्भाचे वेगळे अस्तित्व अत्यंत प्राचीन काळापासून आहे व अत्यंत समृद्ध असा इतिहास या विभागास लाभलेला आहे. संस्कृत कवी राजशेखर यांनी ‘विदर्भ विषय सरस्वती जन्मभू:’अशा शब्दात विदर्भाचा गौरवपूर्ण उल्लेख
केला आहे. असा हा विदर्भ सुरुवातीपासून वेगळे राज्य असल्याचा पुरावा प्राचीन इतिहासापासून तर अर्वाचिन इतिहासापर्यंत आढळतो. परंतु मराठी भाविकांना एकट्या राज्यानी गुंफून ठेवण्याच्या अट्टाहासापोटी ६० वर्षापूर्वी नागपूर करार करून विदर्भाला महाराष्टच्या दावणीला बांधण्यात आले. तेव्हापासून विदर्भाचे स्वतंत्र आस्तित्व संपुष्टात आले.संयुक्त महाराष्टची मागणी करणारे आंदोलन १२ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष ग. त्र्य.
मांडखोलकरयांनी मांडलेल्या ठराव व संयुक्त महाराष्ट समितीच्या स्थापनेपासून विशेष आकारास येऊ लागले. तत्कालीन मुंबई राज्यातील पश्चिम महाराष्ट हा भाग संयुक्त महाराष्टाचाच स्थापनेसाठी उत्सुक होता.हैदाबाद राज्यातील मराठवाडा भागातील लोकांची महाराष्टात सामील होण्याची इच्छा होती. मुख्य अडसर मध्यप्रदेशातील मराठी भाषिक विदर्भाचा होता.नागपूर शहर मध्यप्रदेशच्या राजधानीचे शहर होते. पूर्वी सी.पी. अ‍ॅन्ड बेरार राज्याची राजधानीही नागपूर होती. राष्ट्रीय चळवळीत विदर्भाने मोठी भूमिका बजावली होती. मराठी भाषिक असूनही विदर्भाची वेगळी अस्मिता होती.शिवाय विदर्भाची वेगळी राज्याची मागणीही होती.नागपूर शहराची स्थापना १७०२ मध्ये गोंड राजे बुलंदशाह यांनी केली.
गोंडराजांनी नागपूरकर सुमारे ७५ वर्ष राज्य केले. भोसले राजवंशाने नागपूरच्या इतिहासात लक्षणीय भर टाकली. १८०४ साली भोसल्यांचा नागपूर राजधानीत एल्फिन्सटन हा रेसिडेन्ट म्हणून येऊन बसला. १८५३ साली ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांचे राज्य खालसा केले व रेसिडेंट मॅनसेल याला नागपूर प्रातांचा कमिश्नर म्हणून नेमण्यात आले. १८६१ मध्ये इंग्रजांनी मध्य प्रांत स्थापन करून नागपूरच्या राजधानीचा दर्जा कायम ठेवला. नागपूर वर्धा, भंडारा, चांदा हे विदर्भाचे मराठी भाषिक जिल्हे,
छत्तीसगड व महाकोशल मिळून हे सेंट्रल प्रोव्हिन्स (मध्य प्रांत) हे मूळ राज्य होते. तेव्हा अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलढाणा हे जिल्हे हैद्राबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली होते. केवळ इंग्रजांचे कर्ज परत न करू शकल्यामुळे निजामाने हे चार जिल्हे इंग्रजांना दिल्यानंतर १९०३ मध्ये पश्चिम विदर्भाचे हे चार जिल्हा (बेरार) मध्य प्रांतात जोडल्या नंतर या राज्याचे नाव सी.पी.अ‍ॅन्ड बेरार असे झाले. १९३५ मध्ये ब्रिटिश संसद कायदा झाल्यानंतर भारतातील राज्यात विधिमंडळे अस्तित्त्वात आली. ‘सीपी अ‍ॅन्ड बेरार’साठी वेगळे विधिमंडळ निर्माण झाले.

नागपूर राजधानीत विधान भवन, मंत्रालय, सचिवालय, न्यायालय निर्माण झाले. याच काळात विदर्भातील मराठी भाषिकांनी वेगळ्या राज्याची इच्छा व्यक्त केली होती.
तत्कालीन मध्य प्रदेशातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, अकोला,अमरावती, बुलढाणा व यवतमाळ या आठ मराठी भाषिक जिल्हाचे वेगळे राज्य असावे, अशी वैदर्भीयांची इच्छा होती. तेव्हा हिंदी भाविकांचे बहुमत असलेल्या मध्यप्रांत वºहाड (सीपी अ‍ॅड. बेरार) राज्याच्या विधान सभेत १आॅक्टोबर १९३६ रोजी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, ‘ही विधानसभा हिज मॅजेस्ट्री गव्हर्नमेंटला शिफारस करते वेळी, या सभेचे विचारपूर्णक मत आहे की, या राज्यातील मराठी भाषिक प्रदेश समाविष्ट असलेला विदर्भ नावाचा नवीन प्रांत निर्माण करण्याची सरकारने लवकरात लवकर शक्य असेल ती तरवीज करावी व त्यास निराळा गव्हर्नरांचा प्रांत करावा.’ अकोला करार देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये मध्यप्रदेश राज्याची स्थापना होऊन नागपूर राजधानी कायम झाली. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. नागपूर विदर्भाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी लढ्याचाही सूत्रपात झाला होता. विदर्भातील अनेक नेते संयुक्त महाराष्टर्त समाविष्ट व्हायला तयार नव्हते. त्यामुळे संयुक्त महाराष्टचा पुरस्कार करणाºया नेत्यांनी विदर्भातील नेत्यांशी चर्चा करून १९४७ मध्ये ‘अकोला करार’ घडवून आणला. याबाबत प्रथम ११ जुलै १९४७ रोजी दिल्लीत ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शंकरराव देव, न. वि. उपाख्य काकासाहेब गाडगीळ, द.वि. गोखले, रामराव देशमुख, आचार्य दादा धर्माधिकारी, गोपाळराव काले, ह.वि. कामथ, ग. त्र्य. माडखोलकर आदी सहभागी झाले होते. या बैठकीत बोलताना दादा धर्माधिकारी यांनी विदर्भातील वस्तुस्थिती मांडली होती. संयुक्त महाराष्टÑ निश्चित होणार असे वाटल्यामुळे महाविदर्भाचा उठाव इतक्या जोरात व एकाएकी घडून आला आणि नागपूर प्रांतातील शेकडा पाच कार्यकर्ते सोडल्यास संयुक्त महाराष्टÑाला अनुकूल दिसत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.त्याचा खुलासा करताना ते म्हणाले मी स्वत: महाविदर्भाच्या विरुद्ध आहे.झाला तर संयुक्त महाराष्ट नाही तर आज आहे, तोच मध्य प्रांत-वºहाड अशी माझी भूमिका आहे. दादांच्या या मुद्यावर गोपालराव काळे आणि ह. वि. कामथ सहमत होते.दा. वि. गोखले यांनी पुण्याविषयी जर नागपूर- वºहाडच्या लोकांना भीती वाटत असेल तर आम्ही त्यांना हव्या त्या सवलती देऊ, अशी ग्वाही दिली. त्यानंतरपश्चिम महाराष्ट्र आणि महाविदर्भातील नेत्यांची बैठक ७ व ८ आॅगस्ट १९४७ रोजी अकोल्यात झाली. या बैठकीत बापूजी अणे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कडाडून विरोध केला होता. नागपूर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. स.
कन्नमवार यांनीही विरोध दर्शविला होता. तरीही अकोला करार झाला. या करारात चार मुद्दे महत्त्वाचे होते

१. मध्य प्रांतात हिंदी भाषिक विभागाच्या वर्चस्वाखाली विदर्भ राहणार नाही.

२. संयुक्त महाराष्टची मागणी काही कारणांमुळे जर अमान्य झाली, तर स्वतंत्र महाविदर्भाच्या स्थापनेस महाराष्ट्च्यार नेत्यांनी पाठिंबा द्यावा.

३. विदर्भाने मध्य प्रांताचा वा संयुक्त महाराष्टाचा उपप्रांत म्हणून राहले, असा पर्याय दिला असेल तर विदर्भाने संयुक्त महाराष्टचा पर्याय निवडावा.

४. महाविदर्भ व संपूर्णमहाराष्ट्राचा एक असे दोन उपप्रात असावे. त्या दोन्ही प्रांताची मंत्रिमंडळे आणि कायदे मंडळे वेगळी असावीत, असे या करारात नमूद होते. ८ आॅगस्ट १९४७ रोजी हा अकोला करार करण्यात आला. त्यावर शंकरराव देव, ग.
त्र्य. माडखोडकर , धनंजयराव गाडगीळ, रामराव देशमुख गोपाळराव खेडकर, दत्तो वामन पोतदार, श्रीमननारायण अग्रवाल याच्या सह््या होत्या. दोन उपप्रांताचे यात कलम असल्याने बापूजी अणे व मा. सा. कन्नमवार यांच्याही
सह््या होत्या. या करारानंतर राज्य पुनर्रचनेच्या हालचालींना वेग येऊन विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण होण्याची घटना जवळ यातच या प्रदेशाला महाराष्टात समाविष्ट करण्याच्या उद्देशाने २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला.
राज्य पुर्नरचना आयोगाची शिफारस राज्याच्या पुर्नरचनेचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने एस. फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबर १९५३ रोजी राज्य पुनरचना आयोगाची स्थापना केली. पं. हृदयनाथ कुंझरू व सरदार पणिक्कर हे या आयोगाचे सभासद होेते. या आयोगाने आपला अहवाल १० आॅक्टोबर १९५५ रोजी प्रसिद्ध केला व विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे, अशी शिफारस केली. या आयोगाने सूचविलेले हे मराठी भाषिकांचे एकमेव राज्य ठरणार होते. मुंबईस राजधानी करून गुजरात व महाराष्ट्राचे द्वैभाषिक मुंबई राज्य करावे, असे या आयोगाने स्पष्ट केले होते.विदर्भाबाबत राज्य पुनर्रचना आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले. की,

१.विदर्भातील आठ जिल्ह््यांची पिढीजात सांपत्तिक स्थिती शिल्लक आजही चालू आहे. ही शिल्लक दीड कोटी रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे

. २. विदर्भ राज्य जर महाराष्टÑाशी संलग्न केले तर विदर्भातील उत्पन्न हे केवळ विदर्भाच्या विकासावर व योजनांवर खर्च होईल, याची सकृत दर्शनी शास्वती देत येत नाही.

३. विदर्भ जर मुंबई राज्याशी संलग्न झाला, तर नागपूर राजधानीचे महत्व पूर्णपणे नाहीसे होईल, हे साधार वाटते कारण मराठीचे एकच राज्य केले तरी संपूर्ण राज्याची नैसर्गिक राजधानी व्हावी, एवढी नागपूर नगरीची सुसंपन्नता आहे.

४. महाराष्ट्राशी विदर्भ राज्य जोडले तर विदर्भाच्या राजकारणात जातीयवाद शिरेल, असे कित्येकांनी प्रतिपादिले आहे.५. महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला तर मुंबईकडील कायदे विदर्भात करावे लागतील, अशा वेळी विदर्भ स्वत:च्या संरक्षणासाठी तडफडू लागेल, हे अटळ आहे.

5. विदर्भातील लोकांना हा धोका पत्कारणे अशक्य वाटते. राज्य पुनर्रचना आयोगाने विदर्भास महाराष्टत सामील केल्या गेल्यास त्याची कशी दुर्दशा होईल, हे तेव्हाच स्पष्ट केले होते. याची प्रचीती वैदर्भिय जनतेला पदोपदी येत आहे.
विदर्भ वगळून द्वैभाषिक राज्याच्या कल्पनेस महाराष्टीतील नेत्यांनी विरोध केला होता. अखेर महाराष्ट, गुजरात व विदर्भाचा समावेश असलेले महाद्वैभाविक मुंबई राज्य १ नोव्हेंबर १९५६ रोजी अस्तित्वात आले.विदर्भाचे स्वतंत्र अस्तित्व संपष्टात आले . पुढे संयुक्त महाराष्टÑ व महागुजरात आंदोलनानंतर १ मे १९६० रोजी मुबई राजधानीसह महाराष्टÑ राज्याची निर्मिती झाली. परंतु, या साठी विदर्भाचा राजकीय बळी गेला.मुंबई किंवा महाराष्टeवरील काँँग्रेसची सत्ता सुरक्षित व अबाधित ठेवायची असेल तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला विदर्भ महाराष्टÑात समाविष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी काँँग्रेस पुढाºयांनी आणि प्रामुख्याने पं. जवाहरलाल नेहरू यांनी भूमिका होती. विदर्भीय नेत्यांना विश्वासात घेऊन विदर्भावर
कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले होते. ‘आम्ही विदर्भातील जनतेला समजावलेच नाही, तर त्यांच्यावर जबरदस्ती ही केलेली आहे’ अशी प्रांजळ कबुली ही त्यावेळी पं. नंहरूंनी दिली होती.पवित्र करार
१४ मार्च १९६० रोजी मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक विधान मंडळात मांडताना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सरकारचे धोरणात्मक निवेदन पटलावर ठेवले. त्यात त्यांनी म्हटले की, ज्याला नागपूर करार म्हणतात त्या पेक्षा
शक्य तिथे आधिकची मदत विदर्भ – मराठवाड्याला केली जाईल. त्यात आणखी दोन गोष्टी म्हटल्या गेल्या,
१. विदर्भ आणि मराठवाड्याकरिता स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्यात येतील व त्यांना देण्यात यावयाच्या सरकारी जमेचा व खर्चाचा तपशील दरवर्षी सभागृहासमोर ठेवण्यात येईल.

२. शिवाय विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या खेड्यातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, औद्योगिकरण, पाटबंधाºयाच्या योजना आणि विदर्भातील खनिज संपत्ती उत्खनन याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. शेती मधील संशोधन आणि फळबागांचा विकास या बाबी कडेही शासनाचे लक्ष राहील.तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले की, आम्ही भावी महाराष्ट सरकारच्या वतीने नागपूर कराराच्या पालनाचे पवित्र आश्वासन देतो. भविष्यात नागपूर कराराला कायद्याचे रूप देण्याचा प्रयत्न केला जाईल .घटनेच्या कलम ३७१ नुसार वैधानिक विकास मंडळे निर्माण केली जातील . नागपूरला सरकारचा मुक्काम हलू शकत नसल्यास नागपूरला दुसरी राजधानी म्हणून मान्यता देऊ.विदर्भात काही आॅफिसेस तज्ञांचा सल्ला घेऊन नेऊ.
यशवंतराव चव्हान यांच्या सरकारी धोरणाच्या भाषणात पुण्याहून जी १६ कार्यालये नागपूरला हलविण्याची चर्चा होती, त्यात १. कृषी संचालक, २. शिक्षण संचालक, ३.उच्च शिक्षण संचालक, ४. क्रीडा संचालक, ६. पशुसंवर्धन संचालक, ७.सहकार आयुक्त, ८. संचालक नगर नियोजन, ९. मुख्य वन संरक्षक,१०.आयुर्वेद संचालक, ११. संचालक भूजळ सर्वेक्षण, १२. मुख्य अधीक्षक तुरुंग, १३. मुख्य अधीक्षक निबंधक, १४. जमाबदी आयुक्त आणि भूलेख संचालक,१५. संचालक सार्वजनिक आरोग्य, १६. संचालक सामाजिक कल्याण . या कार्यातत्यांचा समावेश होता. १९६० पासून ५३ वर्षात वन संरक्षकाव्यतिरिक्त एकही कार्यालय पुण्याहून हलेले नाही.
विदर्भात गेल्या ५३ वर्षात औद्योगिकरण न झाल्यामुळे व शासकीय कार्यालयेही पुणे- मुंबईत असल्यामुळे उच्च शिक्षण घेणाºया मुला मुलींना त्यांच्या लायकीच्या आणि पगाराच्या नौकºया विदर्भात अपलब्ध होत नाही. त्यामुळे शिक्षित वर्गासह कामकरी वर्गासही पुणे – मुंबईकडे स्थलांतर करावे लागत आहे. विदर्भातील बेरोजगारांना काम नाही.विदर्भामुळे महाराष्ट समृद्ध महाराष्ट्राकडून घेण्यापेक्षा विदर्भाने अधिक दिले आहे . केंद्र सरकारच्या पर्यावरणील मार्गदर्शक तत्वाप्रमाणे राज्याच्या भूभागाच्या ३३टक्के भूभागावर हवामान सुरक्षेकरिता जंगले असणे आवश्यक आहे. २००७-८ मध्ये महाराष्टाचे भौगोलिक क्षेत्र ३०८ हजार चौ. किमी होते व वनाच्छादित क्षेत्र ६२ हजार चौ. कि. मीटर म्हणजे १६.१५ टक्के इतके होते. परंतु ,
जेवढे जंगल आहे. त्यापैकी ८० टक्के जंगल विदर्भातच आहे. विदर्भातील कोळसा, पाणी, व जमीन वापरून जी वीज निर्मिती रोज होते .त्यापैकी ६० टक्के वीज विदर्भाच्या बाहेर महाराष्टÑात पाठविली जाते. म्हणजे संसाधने विदर्भाची आणि औद्योगकरण अन्य प्रदेशाचे होत आहे. कापसाचे उत्पादन विदर्भात होते .सूत गिरण्या अन्य प्रदेशात असे घडले आहे . आता तर सरकारने मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण औद्योगिक पट्टा घोषित केला आहे याला पुढे औरंगाबाद जोडून औद्योगिक चतुष्कोण बनविण्याचा घाट घातला गेला आहे. तिकडे मुंबई-दिल्ली कॅरिडोर बनविला जात आहे . सगळे औद्योगिकरण, विकास पश्चिम महाराष्टÑ-मुंबई परिसरात केंद्रित होत असल्याने मुंबई पासून दूरच्या नागपूर- विदर्भाचा विकास होणे दूरापारही आहे. वीज विदर्भाची असूनही तिचा उपभोग महाराष्टात होत आहे. विदर्भात मात्र उद्योगांना सवलतीत वीज देण्यास सरकार तयार नाही. त्यामुळे उद्योग येथून पळ काढत आहेत. विदर्भात ४ ते ८ तासाचे भारनियमन लादण्यात आल्याने आपल्याच हक्काच्या विजेपासून येथील जनता वंचित आहे.

शिवाय अवाढव्य बिलाचा भुर्दंड जनतेला सोसावा लागत आहे. विदर्भ स्वतंत्र राज्य असते तर छत्तिसगड प्रमाणे विदर्भातही २४ तास वीज पुरवठा व स्वस्त वीज नागरिकांना मिळू शकली असती. नोकºयांवर ‘डल्ला’नागपूर करारात लोक संख्येच्या प्रमाणात नोकर भरतीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु , ते कधीच पाळले गेले नाही. त्यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली. ऐवढेच नव्हे तर संपूर्ण राज्य एक घटक मानून निवड प्रक्रिया राबविल्या जात असल्याने पश्चिम महाराष्ट व उर्वरित महाराष्टातील लोकांनी येथील हजारो नोकºया बळकाविल्या.प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारने ५ टक्के आरक्षण नोकर भरतीत ठेवले आहे. परंतु , त्यातही ३ टक्के अंतर्गत आरक्षण लातूर, उस्मानाबादच्या भूकंपग्रस्तांसाठी ठेवल्याने विदर्भातील प्रकल्पग्रस्तांसाठी ठेवल्याने विदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या जागांवर मराठवाड्यातील भूकंपग्रस्तांनी कब्जा मिळविला आणि येथील प्रकल्पग्रस्त हजारो तरुण वयोमर्यादेची अट संपूनही बेरोजगार राहिले आहेत. विदर्भाच्या हक्काच्या नोकºयांवर उर्वरित महाराष्टÑातील लोकांनी डल्ला मारला आहे. मराठी अस्मितेच्या नावावर परप्रांतिय हमाल, मजूर,फेरीवाल्यांना पिटाळून लावणाºयांनी या बद्दल कधी चक्क शब्द काढला नाही. त्यांच्या दृष्टीने मुंबई-पुणे- नाशिक पुरतीच
मराठी अस्मिता आहे काय ?
नागपूर कारणानुसार एकपूर्ण अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे ठरविले असताना दोन ते तीन आठवड्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुंडाळले जाते. नागपूर करारात म्हटल्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च केला गेला नाही. म्हणून मागास भागांचा अनुशेष वाढत गेला. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३७१(२) प्रमाणे विदर्भाच्या विकास करण्यासाठी राज्यपालांना दिलेल्या विशेष अधिकाराचे पालन महाराष्टÑ सरकार करीत नाही. सिंचन, आरोग्य, शिक्षण, औद्यागिक विकासाच अनुशेष ३ लाख कोटींवर पोहोचला तो कधीच भरून निघण्याची शक्यता नाही. ज्या कराराची अंमलबजावणी होत नाही तो करार कायद्याच्या भाषेत, मूळातच रद्दबादल होतो. म्हणजे, ज्या कराराच्या आधारे विदर्भ महाराष्टात सामील होण्यास राजी झाला, परंतु,त्यास कायदेशिर स्वरूप देण्याचे सरकारने पद्धतशीरपणे टाळले . ज्याच्या बहुतेक कलमांना कधीच पाळले नाही. तो नागपूर करार काही वैदर्भिय जाळत असतील तर त्यांचे काय चुकले ..

जय विदर्भ

अविनाश पाठक,नागपूर

नागपुर विद्यापीठावर धडकला एबीवीपीचा विराट मोर्चा

0

नागपूर, दि. 27 – शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयांच्या दर्जासंदर्भात सकारात्मक पावले उचलली नाही, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना उपराजधानीत पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्यात भाजपा आघाडीची सत्ता असूनदेखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभाविपने काढलेला मोर्चा हा शासनाला घरचा अहेरच मानण्यात येत आहे.