भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५00 मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी धरण विभागाने ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू केले आहे. या दरवाजामधून १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता बळावली आहे. वैनगंगा नदीच्या वरच्या भागात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात नदी-नाले आणि धरणाचा जलस्तर वाढला आहे. संभावित पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर जलाशयाचे दरवाजे सुरू केल्यामुळे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे.
कालीसराड धरणाचे दोन दरवाजे १.६0 मीटर, पुजारीटोला धरणाचे १0 दरवाजे १.२0मीटर तर सिरपूर धरणाचे ६ दरवाजे 0.३0 मीटरने सुरू केले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत आहे.
गोसेखुर्द धरणाचा वाढता जलस्तर लक्षात घेता ३३ दरवाजांपैकी २९ दरवाजे सोमवारच्या रात्री ११ वाजता अर्धा मीटरने सुरू करण्यात आले. या दरवाजांमधून १ लाख ४.५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारला सकाळी कारधा नदी पुलावर वैनगंगा नदीचा जलस्तर ४.९७ मीटर नोंदविण्यात आला असून ९ मीटर या धोक्याच्या पातळीपासून ४ मीटरने खाली आहे.
‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा
तिरोडा : शुक्रवारी ९ सप्टेंबरला गोंडमोहाडी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात धानपिकांवर लागणारे रोग, रोगांवरील औषधींचे नावे व किती प्रमाणात औषधी फवारणी करावी तसेच धानपिकांना कोणत्या प्रकारे रोग लागण्याची शक्यता असते व उपाययोजना यावर शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी शासनाच्या शेतीविषयक योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास जनतेस प्रवृत्त केले. अध्यक्षस्थानी आ. विजय रहांगडाले होते. मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी पोटदुखे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चिंतामन रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री चतुर्भुज बिसेन व समस्त गावकरी उपस्थित होते.
हरिणखेडेना कनिष्ठ लेखाधिकारी पदावर पदोन्नती
गोरेगाव,दि.१३-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त विभागार्तंगत कार्यरत फनेंद्र हरिणखेडे यांची तिरोडा पंचायत समिती येथून गोरेगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.हरिणखेडे यांनी ३१ ऑगस्ट रोजी गोरेगाव ंपंचायत समितीमध्ये कनिष्ठ लेखाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारली असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जलतरण केंद्रात चिमुकल्याचा मृतदेह

मराठा मोर्चे दलितविरोधी असल्याचा संघाकडून प्रचार होतोय- प्रकाश आंबेडकर
सडक अर्जुनी व तिरोडा मनसे तालुकाध्यक्षांची निवड
berartimes.comगोंदिया,दि.१३- गोंदिया जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्षांच्या नियुक्ता करीत शुभेच्छा दिल्या.यामध्ये राजूभाऊ यावलकर यांची सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी तर बबन बडोले उपाध्यक्षपदी निवड झाली.तर अमोल लांजेवार यांचीही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे तिरोडा तालुका अध्यक्षपदी खुशाल राऊत यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी नवनियुक्त पदाधिकाèयाना शुभेच्छा दिल्या तसेच पक्षवाढीसंबंधी मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष मिलन रामटेककर, मुकेश मिश्रा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उदय पोफळी, शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे, उदय काळे, राजेश नागोसे, दिलीपजी कोसरकर, प्रवीण उके, गणेश शहारे, रणजीत काणेकर, संदीप भेंडारकर, भूषण पटले, कपिल टेंभरे, राजेश गोटेफोडे, निलेश मेश्राम, नितेश कटरे, कुणाल टेंभरे, राधे हिरापुरे, प्रमोद काशमे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
बकरी ईदच्या दिवशी काश्मीरमधील 10 जिल्ह्यात कर्फ्यू
श्रीनगर- 90 च्या दशकानंतर पहिल्यादा बकरी ईदच्या दिवशी काश्मीर खोर्यातील 10 जिल्ह्यांंमध्ये संंचारबंंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील महत्वाच्या मशिदी बंद असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात दोन युवकांंचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूूमीवर काश्मीर खोर्यातील वातावरण जास्त चिघळणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा, बंदीपुरा, शोपियन आणि कुलगामसह 10 जिल्ह्यात संंचारबंंदी लागू करण्यात आली आहे. या काळात इंटरनेट सर्व्हिसेस बंद करण्यात आली आहे. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येेणार आहे.दरम्यान, बुरहान वानीच्या मृत्यूनंतर सुरू झालेला जम्मू काश्मीरमधील हिंसाचार अजूनही कायम आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हिंंसाचाराला ‘कश्मीरी नागरिकांंची कुर्बानी’ असेे संंबोधले आहे.
राज्याने अॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याच्या केंद्राला शिफारशी कराव्यात – विनायक मेटे
मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न
१८ सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा
गोंदिया: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या १८ सप्टेंबर रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर विधान भवनावर काढण्यात येणाèया मोच्र्याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच ओबीसी महिला मेळावा, ओबीसी विद्यार्थी मेळावा, ओबीसी अधिकारी-कर्मचारी मेळावा आदी आयोजित करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनावरील मोच्र्या संदर्भात प्रत्येक जिल्हास्तरावर जाऊन ओबीसी संगठना व पदाधिकाèयांची चर्चा करण्याचे ही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शरद वानखेडे,खे‘ेंद्र कटरे विनोद उलीपवार, भूषण दडवे, रमेश पिसे, सुषमा भड, मनोज चव्हाण, निकेश पिणे, गुणेश्वर आरीकर, गोपाल सेलोेकर आदींनी दिली आहे.