23.4 C
Gondiā
Thursday, July 10, 2025
Home Blog Page 6

सरकारी-निम सरकारी, जि.प.कर्मचाऱ्यांचे 9 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

0

गोंदिया दि.०६–सरकारी-निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगरपालिका-नगरपरिषदा कर्मचारी समन्वय समितीची सभा दिनांक 6 जुलै 2025 रोजी मध्यवर्ती संघटनेचे कार्यालय गोंदिया येथे संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाचे आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत उदाशिन धोरण दिसुन येत आहे. नवागत सरकार स्थापण झाल्यावर सहा महिण्याचा कालावधी लोटुन गेला मधल्या कालावधीत  मुख्यमंत्री पातळीवर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यात यावे यासाठी राज्य संघटनेमार्फत सातत्याने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु संघटनात्मक प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आली. प्रलंबित मागण्याबाबत कर्मचारी वर्गात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाचे मात्र या संदर्भात उदाशिन धोरण दिसून येत आहे.

देशातील प्रधान 11 कामगार संघटनांच्या वतीने दिनांक 09 जुलै 2025 रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मार्च 2023 मध्ये झालेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमिवर दिलेल्या आस्वासनाची पुर्तता अद्यापर्यन्त शासन स्तरावरुन करण्यात आली नाही त्यामुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट उमलली आहे. तसेच शासनाने दिनांक 6 सप्तेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील सर्व विभागातील वर्ग 1 ते 4 पर्यन्त कर्मचारी कंत्रााटी कामगार नऊ कंपनीकडून भरण्याचे आदेश काढले आहे. त्यामुळे भविष्यात सरकारी कर्मचारी राहणार नसून सर्व कंत्रााटी कामगार असतील अशा शासनाच्या धोरणामुळे फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे प्रलंबित 20 मागण्या बाबत दिनांक 09 जुलै 2025 रोजी दुपारी 1 ते 3 या दरम्यान मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयासमोर भव्य निदेर्शने करण्यात येणार आहेत. व  जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत  मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
समन्वय समिती सभेमध्ये मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर वैद्य, निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष पी.जी.शहारे, कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष ग्राम पंचायत अधिकारी यूनियन यांचे समवेत आशिष रामटेके, संतोष तोमर, सौरभ अग्रवाल, भगीरथ नेवारे, राकेश डोंगरे, रमेश नामपल्लीवार, तु.बा.झंजाड, विस्वनाथ कापगते, डी.एल.गुप्ता, उमेश कावरे, सुरेश आष्टिकर, नितेश बांते, जितेंद्र अदमाने, विदेश सासरे, मोहनलाल पटले, यासह जिल्हयातील विविध विभागातील मोठया संख्येने शासकिय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

0

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

 पंढरपूर/ गोंदियादि.जुलै: पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.

       आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.

       मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे.  इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले.

       आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने  खऱ्या अर्थाने  भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

        निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली.  खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये  प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.  राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती  महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

      यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने   व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

     प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

      शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी  मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा  ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक – श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक १३, जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा. द्वितीय क्रमांक – श्री बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक १९, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतीय क्रमांक – श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक २३, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

दुर्मिळ AB- रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवले – माणुसकीचा उत्तम आदर्श

0

गोंदिया – शहरातील सहेजपूर दांडेगाव येथील रहिवासी सलोचना रंजनकुमार नागपुरे (वय ३९ वर्षे) यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मीरावत हॉस्पिटल येथे डॉ. वैद्य यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता आहे आणि तातडीने AB- निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असून हजारो लोकांमध्ये एखाद्याचामध्ये आढळतो.

परिवारातील सदस्यांनी रक्तमित्र विनोद चांदवानी (गुड्डू) यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच विनोद चांदवानी यांनी तात्काळ त्यांच्या नियमित AB- रक्तदात्यांच्या यादीतील शाम नोतानी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

शाम नोतानी यांनी क्षणाचाही विलंब न करता लोकमान्य ब्लड बँक येथे जाऊन AB- रक्तदान करून माणुसकीचे उदाहरण साकारले. त्यांच्या या रक्तदानामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

या प्रेरणादायी आणि मानवीय कार्याबद्दल विनोद चांदवानी (गुड्डू) व अपूर्व लिलहारे यांनी शाम नोतानी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

नागपुरे कुटुंबियांनी रक्तदाता शाम नोतानी तसेच रक्त समन्वयक विनोद चांदवानी यांचे मनःपूर्वक आभार मानले व समाजासाठी हे कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर विवीध विकासात्मक कामाचे उद्घाटन

0

*जि.प.सदस्य किरण पारधी यांचा पुढाकार
चित्रा कापसे
तिरोडा–तालुक्यातील मिनी पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बेलाटी बु.येथे आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी श्री विठ्ठलरुक्माईची पूजा अर्चना करून अनेक विकास कामाचे भूमिपूजन केले.

भूमिपूजनाचे उद्घाटन टिकास मारून जि प सदस्य किरण पारधी, प.स. सदस्य पिंटू चौधरी, गावातील सरपंच सौ. स्वातीबाई चौधरी, उपसरपंच मोरेश्वर आगाशे, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावकरी बांधव, शाळेतील सर्व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपस्थित होते.
या विविध कामांचे भूमिपूजनात जिल्हा परिषद पंधरावे वित्त निधीतून बंदिस्त नाली बांधकाम ५ लाख रुपये, आरो प्लांटचा लोकार्पण (खासदार सुनील मेढे यांच्या प्रयत्नातून) पंचायत समिती निधीतून शौचालय दुरुस्तीचे काम, वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर आगाशे व आभार प्रदर्शन पिंटू चौधरी यांनी केले
याप्रसंगी गाव सदैव सुख शांती समाधानाने व समृद्धीने पूर्ण रहावे म्हणून विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी गावातील सरपंच उपसरपंच यांनी साकडे घातले.

भुयारी गटार योजनेवर आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा

0

मुख्याधिकारी मालकर व कंत्राटदारांची उपस्थिती
नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांच्या प्रश्नावरही चर्चा
चित्रा कापसे
तिरोडा–भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मालकर तसेच कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.

बैठकीत नागरिकांनी गटार योजनेमुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक रस्ते खोदले गेले असून योग्य दुरुस्ती न झाल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर आमदार श्री. रहांगडाले यांनी स्पष्ट शब्दात कंत्राटदार व प्रशासनाला सूचना दिल्या की काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे.शुक्रवार पर्यंत वेळ देवून रसत्याची डागडुजी करुण सुररित करण्याचे कंट्रातदार ला आमदार यानी बजावले

याच बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था देखील चर्चेचा विषय ठरली. अनेक भागांतील रस्ते खड्डेमय असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी मालकर यांनी दिले.

जनावरांची तस्करी करणारा वाहन जप्त; चालक फरार

0

देवरी- तालुक्यातील मुरदोली गावाजवळ 12 बैल कोंबून भरलेला ट्रक देवरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाहन चालक फरार झाला. ही कारवाई शनिवार, 5 जुलै रोजी पहाटे 7.30 वाजता दरम्यान करण्यात आली. पोलिसांनी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. MH 40, D 6035 क्रमांकाची महिंद्रा पिकअप आमगाव आदर्श – मुरदोली मार्गे सुसाट वेगाने देवरी महामार्गाकडे जाताना गस्तीवर असलेले पोलिसांना दिसला. थांबण्याचा इशारा केल्यानंतरही तो भरधाव निघाला. वाहनाच पाठलाग सुरू केला. ताडपत्री झाकून असलेला ह्या ट्रकला देवरी तालुक्यातील महामार्गावरील मुरदोली गावाजवळ शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतला तोपर्यंत चालक पसार झाला होता. वाहनास 12 जनावरे असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल देवरी पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये देवरी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास सुरूवात केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक प्रविन डांगे यांच्या मार्गदर्शनात पो.ह. परसमोडे, चालक पो.ना. पंकज पारधी, पो.सी. अनिल ऊईके , पो.सी. विनोद बिसेन यांनी केली आहे.

सिटी सर्वे कार्य की हर हफ्ते पेश करें रिपोर्ट : विधायक अग्रवाल

0

गोंदिया : चार साल पूर्व से मंजूर नगर भूमापन (सिटी सर्वे) के मंद गति से चल रहे कार्य पर विधायक विनोद अग्रवाल ने नाराजगी जताते हुए इस कार्य को तीव्र गति देने के कड़े निर्देश दिए।
गोंदिया के उपविभागीय अधिकारी कार्यालय में 4 जुलाई को नगर भूमापन एवं शहर के विभिन्न मुद्दों को लेकर बैठक ली गई। बैठक में एसडीओ चंद्रभान खंडाईत, उप अधीक्षक भूमि अभिलेख अजय शिरसागर, अपर तहसीलदार व मुख्याधिकारी श्रीकांत कांबड़े, तहसीलदार शमशेर पठान, सुनील केलनका, ऋषिकांत साहू, विवेक मिश्रा, जितेश टेंभरे, लीमेंद्र बिसेन, नुरुनाथ दिहारी, नगर रचना विभाग के श्री तुरकर, विश्वजीत मेश्राम सहित अन्य अधिकारियों की उपस्थिति रही। विधायक विनोद अग्रवाल ने इस बैठक में शहरीकरण को लेकर, किये जा रहे नगर भूमापन (सिटी सर्वे) के कार्य की समीक्षा की। सिटी सर्वे कार्य हेतु पुनर्मोजनी, ड्रोन सर्वे, स्पॉट सर्वे के साथ ही शहरी सीमा हद से सटे 7 गाँव फुलचुर, कटंगी, कुड़वा, मुर्री, पिंडकेपार, गोंदिया खुर्द और गोंदिया बुजुर्ग में कितना कार्य किया गया इसकी जानकारी ली। संज्ञान में आया कि सिटी सर्वे एवं पुनर्मोजनी कार्य मंद गति से किया जा रहा है, इस पर विधायक विनोद अग्रवाल ने नाराजगी व्यक्त कर इस कार्य को तेजगति देने के निर्देश दिए। सर्वे में टीम को बढाने , मेप फाइनल करने के कार्य को गति देने और सप्ताह में 200 प्रॉपर्टी के लक्ष्य को पूरा करने के निर्देश दिए। उन्होंने अधिकारियों को यह भी निर्देश दिए कि वो प्रत्येक हफ्ते इस कार्य की बैठक लेकर इसकी रिपोर्ट प्रस्तुत करें।

8 दिन में दूकान/कमरें लीलाव करें..
बैठक में विधायक विनोद अग्रवाल ने नगर परिषद द्वारा बनाएं गए संकुलों के महीनों से बंद पड़े कमरों/गालों को लीलाव न करने पर नाराजगी व्यक्त की। उन्होंने कहा कि, नगर पालिका का ध्यान आमदनी पर नही है, रखरखाव पर नही है। दुकान खाली पड़ी है पर किस वजह से नही दी जा रही समझ से परे है। उन्होंने कड़े निर्देश देकर इनका लीलाव 8 दिन में कर सूचित करने की जानकारी दी।

सफाई पर ध्यान केंद्रित करें…
बैठक में विधायक विनोद अग्रवाल ने मार्केट एरिया में, मटन मार्केट परिसर में फेंके जा रहे वेस्ट मटेरियल और कूड़ा कचरा न उठाने पर गंभीर संज्ञान लिया। उन्होंने कहा कूड़ा कचरा अगर दुकानदार स्वयं अव्यवस्थित रूप से फेकेंगा तो इसका असर पूरे परिसर में दिखाई देगा। मटन और मछली मॉर्केट परिसर में मांसाहार वेस्ट मटेरियल को यहाँ वहां फेकने से परिसर में दुर्गंध फैल रही है। इसका स्वास्थ्य पर बुरा असर पड़ रहा है।

घंटा गाड़ी ख़िरीदी करने के निर्देश…
विधायक विनोद अग्रवाल ने मटन, मछली मार्केट में साफ सफाई का ध्यान रखते हुए एक कचरा गाड़ी खड़ा रखने और वेस्ट मटेरियल उसी में फेकने के दुकानदारों को आदेश देने हेतु सूचित किया। इसके साथ ही बाजार परिसर कचरा संकलन हेतु 10 नई घंटा गाड़ी खरीदने की प्रक्रिया करने के निर्देश दिए।

एम.जी. कृषीतंत्र निकेतनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये घवघवीत यश

0

गोंदिया,दि.०६ः : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबई, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कृषी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम. या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल शनिवार 5 जुलै 2025 ला लागला. यामध्ये एम.जी. कृषीतंत्र निकेतन, मुर्री चौकी, गोंदियाच्या निकाल 97 टक्के लागलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या परिक्षे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी सौ. मयुरी बघेले या विद्यार्थीनीने 81.56 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याच्या पाठोपाठ आदित्य सुखदेवे 80.11 टक्के, कु. तरू भालाधरे 77.56 टक्के, योगेश हिंगे 75.56 टक्के, रत्नमाला पटले 75.33 टक्के गुण घेऊन यश संपादन केलेला आहे. विदर्भात कृषीतंत्र क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. कृषीतंत्र निकेतनला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ, मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात. विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय महाविद्यालयाचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे. या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. सौरभ बघेले, प्रा. आकाश श्रोते, प्रा. सम्येक गणवीर, राजु रहांगडाले, राजाभाऊ उंदिरवाडे, श्रीमती योगेश्वरी ठवरे व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याची बाम्हणी येथे कृषिभेट

0

गोंदिया, दि.०५- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी काल शुक्रवारी (दि.०४) आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील शेतशिवाराला भेट दिली.

मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस सी अवताडे, कार्यक्रम समन्वयक मिथून भगत कार्यक्रम अधिकारी कमलेश चव्हाण सहप्रमुख सुयोग उराडे यांचे मार्गदर्शनाखाली हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सध्या आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना  शेतीविषयक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन आदी विषयांवर शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करीत आहेत

.याचाच एक भाग म्हणून कृषिमहाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी भदाडे, तेजस्विनी बिसेन, सुहानी भुसारी, विशाखा आंबेडारे, वैदवी भरणे यांनी बाम्हणी येथील शेतकरी कालिचरण भिमटे यांच्या शेतशिवारास भेट दिली. या भेटीत या विद्यार्थिनिंनी त्यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. यावेळी श्री भिमटे यांना या विद्यार्थिनींनी जलसिंचनासाठी शेततळे कसे उपयुक्त आहे, ते पटवून देत जलव्यवस्थापनाविषयी त्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी श्री भिमटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना या विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे शंका समाधान केले. याशिवाय यावेळी त्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक माहिती, पर्यावरणाचे महत्व, जैविक तंत्रज्ञान, शेतीचे आधुनिक प्रकार आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एक पेड माॅ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

0

गोरेगाव (प्रतिनिधी) — “एक पेड माॅ के नाम” या अभिनव उपक्रमांतर्गत पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोरेगाव येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सी. डी. मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मातेसम प्रेम व्यक्त करत तिच्या नावे एक झाड लावले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेमाचा भावही जपण्यात आला.कार्यक्रमामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यवेक्षक ए एच कटरे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना दरवर्षी एक झाड लावण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संयोजन सौ. ए एस बावनथडे यांनी केले. शेवटी सर्वांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला.