40.1 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5676

गोंदिया रेल्वे स्थानकावर दिव्यांगासाठी बॅटरी कार सेवा

0

मार्च २०१७ पर्यंत एक्सलेटर आणि लिफ्ट सेवा सुरु करणार नाना पाटोले
गोंदिया,दि.5- गणेश चतुर्थीचे निमित्त साधून येथील जनता सहकारी बँकेच्या वतीने .गोंदिया रेल्वे स्थानकावर वृध्द आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वेप्लेटफार्मपर्यंत ने आण करण्याकरीता बॅटरी कार सुरु करण्यात आली. भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे रेल मंडळ प्रबंधक अमित अग्रवाल,अर्जुन सिब्बल ,जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राधेशयाम अग्रवाल यांच्या उपस्थितीत कारचे लोकार्पण करण्यात आले. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्र ,मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्याच्या सीमेला लागून असल्याने रोज २० हजाराच्या वर प्रवाशी गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय निर्माण होऊ नये म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकावर मागील महिन्यात आटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशीन लावण्यात आले .तर आजपासून दिव्यांग लोकांकरीता निशुल्क बॅटरी कार सेवा सुरु करण्यात आली. गोंदिया रेल्वे स्थानकाला अजून सुसुज्ज करण्यासाठी मार्च २०१७ पर्यत्न गोंदिया रेल्वे स्थानकावर एक्सेलेटर आणि लिफ्ट सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे खा. पाटोले यांनी सांगितले.सोबतच मार्च 2018 पर्यंत जबलपूर मार्गावर रेल्वेसेवा सुरु होणार असून दक्षिणेकडे जाणार्या किमान 50 गाड्या या स्थानकावरुन जाणार असल्याचे सांगितले.येथील जनता सहकारी बँकेकडून स्वयंखर्चाने सुरु करण्यात आलेल्या कार सेवे करीत दोन चालकांची व्यवस्था करण्यात आली आहे.या चालकांचा पगार हि बँक देणार आहे आणि या बॅटरी कारचे मेन्टनेशन देखील बँक कारणांर असल्याने फक्त रेल्वे विभागाला बॅटरी चार्जिंग करण्याकरीता वीज पुरवठा करायचा आहे त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर आलेल्या दिव्यांग लोकांना होम पॅलेट फॉर्म १ ते ७ पर्यंत हि कार निशुक्ल पोहचविण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाला रमण मेठी,बँकेचे संचालक,रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,न.प.बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे,गोकूल कटरे,सुनिल केलनका,भगत ठकरानी,महेश आहुजा,गुड्डू कारडा,भरत क्षत्रिय,घनश्याम अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.संचालन नगरसेवक दिनेश दादरीवाल यांनी केले तर आभार बँकेचे व्यवस्थापक उमेश जोशी यांनी मानले.

हामिद करझाई भारतात बनले चौथ्यांदा पिता!

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला शहरातील येथील रुग्णालयात जन्म दिला. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथे अपत्य आहे.

भारतामधील अफगणिस्तानचे राजदूत शाइदा मुहम्मद अब् दाली यांनी सांगितले की, ‘अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई हे चौथ्यांदा भारतात पिता बनले आहे. त्यांच्या पहिल्या तिन्ही मुलांचा जन्म येथील अपोलो रुग्णालयात झाला आहे. चौथ्या कन्येचा जन्म शनिवारी (ता. 3) सकाळी अकरा वाजता अपोलो रुग्णालयात झाला. पत्नी व कन्येला भेटण्यासाठी काही वेळ ते रुग्णालयात आले होते. यानंतर ते लंडनला रवाना झाले.‘

पोलीस बाॅईज संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

भंडारा,दि.5-पोलीस बाॅईज संघटन भंडाराच्या वतीने मुंबई वाहतुक पोलीस कांस्टेबल विलास शिंदे आणि तुमसर पोलीस स्टेशनचे गुप्त शाखेचे पोलीस शिपाई राजु साठवणे या दोघांना झालेल्या मारहाण प्रकरणातील गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यानावाने जिल्हाधिकारी भंडारा मार्फेत पाठविण्यात आले.पोलीस देशाच्या, समाजाचा अहोरात्र रक्ताचे पाणी करून रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असतांना जर असेच अत्याचार व त्यांच्यापरिवारावर अन्याय केला जात पोलीस कर्मचारी यांचे कुटुंब असुरक्षित राहणार आणि त्यांनी कुणाकडे रक्षणाची मागणी करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी तुषार हटेवार, पंकज ठवकर, लक्ष्मीकांत भलावी, शशांक शेळके, शुभम मते, नमित सयाम, रजत कटरे, शुभम कटरे, सागर मते, शुभम मंदुरकर, शुभम आदमने, भारत चौधरी, सागर कुंभारे, तुषार सुरंकर, सचिन बावने व जिल्हय़ातील इतर पोलीस बाॅईज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार रहांगडाले यांचा सेवानवृत्ती सत्कार

0

गोंदिया-येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न पुरवठा विभागात कार्यरत धान्य खरेदी अधिकारी तथा तहसीलदार हरीराम रहांगडाले यांचा ३१ ऑगस्ट रोजी सेवानवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
हरीराम रहांगडाले यांनी ३४ वर्ष शासनाची सेवा केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात जिल्हा पुरवठा अधिकारी एस.के.सवई यांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नारनवरे यांनी तर आभार सहाय्यक पुरवठा अधिकारी आर.एस. अरमरकर यांनी मानले. शेवटी सर्वांनी रहांगडाले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

दक्षिण फिलीपीन्सला भूकंपाचा धक्का

0

वृत्तसंस्था
मनिला – दक्षिण फिलीपीन्समधील बेटांना आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला.

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण फिलीपीन्समधील मिंडानाओ बेटांना आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली आहे. मिंडानाओ बेटावरील हिनातुआन शहरापासून 12 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पहिल्या सौर कृषिपंप ऊर्जीकरणाचे लोकार्पण

0

वर्धा : राज्यात विजेची वाढती मागणी बघता शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना दिवसा १0 तास अखंड वीज पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील सर्व कृषी फीडर हे सौर उज्रेवर कार्यान्वित करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या सौर कृषि पंप उर्जीकरणाचा लोकार्पण कार्यक्रम कांरजा तालुक्यातील बोरगाव (ढोले) येथील देविदास रामधम यांच्या शेतात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ. अमर काळे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारंजा पं.स. समिती सभापती संगीता खोडे, कारंजा नगर पंचायत अध्यक्ष बेबी कठाणे, मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, अपारंपरिक ऊज्रेचा अधिकाधिक वापर करण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. महाराष्ट्रात १५ हजार मेगावॅट उर्जानिर्मिती सौर ऊज्रेवर करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ७00 ते ८00 कृषी पंप एका फीडरवर असणार्‍या भागासाठी सोलर कृषी फीडर योजना राबविण्यात येईल. यातील एक फीडर पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येईल. सोबतच गावातील नळ योजनाही सौर ऊज्रेवर चालविण्याचा शासनाचा मानस आहे.
विदर्भ मराठवाड्यात २00५ पासून १ लाख ९८ हजार शेतकर्‍यांनी पैसे भरूनही कृषी पंपाच्या जोडण्या प्रलंबित होत्या. यामुळे अनुदानाची वीज शेतकर्‍यांना मिळत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी यासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करून दिली. यामुळे केवळ दीड वर्षात कृषी पंपाच्या सर्व जोडण्या शेतकर्‍यांना देण्यात आल्या. शेतकर्‍यांना अखंड वीज मिळावी म्हणून सोलर पंपाची योजना सुरू केली.
महाराष्ट्रात १0 हजार सोलर पंप बसविण्याचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आले. यात येणार्‍या अडचणी व त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विंधन विहिरीवर सौर पंप, १0 एकर शेती असणार्‍या शेतकर्‍याचा समावेश, शेतकर्‍यांना भरावयाचा पाच टक्के हिस्सा एकरकमी न आकारता टप्पा-टप्प्यात घेण्याचा विचार शासन करीत आहे, असेही ते म्हणाले.
प्रगत महाराष्ट्रात अजूनही १७ लाख कुटुंब विजेपासून वंचित आहेत. १00 टक्के कुटुंबांना वीज मिळण्यासाठी २0१९ पर्यंत पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन मधुसूदन मराठे यांनी तर आभार सुनील देशपांडे यांनी मानले.

दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

तुमसर : शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. डॉ. डांगे यांची केवळ बदली न करता त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप महिला पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांमार्फत राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.
जयश्री ठवकर यांचा मृत्यू डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला. जयश्री ठवकर यांना रुग्णालयात सकाळी ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉ. डांगे यांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीत गर्भातील बाळ दगावल्याचे दिसून आले. डॉ. डांगे यांनी उलट सर्व व्यवस्थित आहे, असे ठवकर दाम्पत्यांना सांगितले. त्यानंतर रात्री ९.३0 च्या सुमारास जयश्री ठवकर यांचा मृत्यू झाला.
डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे जयश्री ठवकर यांना आपला जीव गमवावा लागला. आरोग्य विभागाने डॉ. संध्या डांगे यांचे स्थानांतरण भंडारा येथे केले. स्थानांतरण रद्द करून त्यांना सेवेतून निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप महिला आघाडी पदाधिकार्‍यांनी केली. शिष्टमंडळात भाजप महिला आघाडी अध्यक्षा कुंदा वैद्य, माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार, नगरसेविका शोभा लांजेवार, लक्ष्मी इळपाचे, सुषमा पटले, पुष्पा तलमले, भारती साठवणे, पद्मा बिसेनसह मोठय़ा संख्येने भाजप महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

खापावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार, आमदारांना घेराव घालणार

0

तुमसर : येथील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी जमावाने आपले गर्‍हाणे ऐकवण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. येथील आमदार, खासदार यांनी दखल घेतली नाही. परिणामी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाल्या आहेत. आठवडाभरात खापावासीयांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर आमदार, खासदारांना घेराव घालणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, पमा ठाकूर, उषा जावळे, अंकुर ठाकूर उपस्थित होते. यावेळी भुरे यांनी, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णांचे बेहाल झाले आहेत. रूग्णालयात तीन स्त्री रोग व प्रसुती तज्ज्ञाची जागा असताना केवळ एकच जागा भरण्यात आली आहे. इथल्या परिचारिकांच्या उर्मठ वागणुकीमुळे जनता त्रस्त झाली आहे. डॉक्टर मुख्यालयी राहत नाही आदी समस्या असताना आमदारांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. परिणामी अशा घटनांना सामोरे जावे लागते व नागरिक जेव्हा प्रशासनाचा विरोध करतात त्यांच्या चुका त्यांच्या समोर दाखविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. या अगोदरही आंदोलन, रास्तारोको करण्यात आले. परंतु कधीच असे घडले नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी नागरिकांना शेवटपर्यंत समजाविण्याचा कार्य केले. मात्र त्यांनाही हेतुपुरस्सर या प्रकरणात गोवण्यात आले व त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच बरोबर गावातील इतरही नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात पाठविले जाणार आहे. असे असताना येथील आमदार, खासदारांनी मौन बाळगले आहे. शासनस्तरावर प्रयत्न करून खापा वासीयांवरील गुन्हे मागे घेणे, लाठी चार्जचे आदेश देणार्‍या त्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करणे तसेच पीडिताच्या परिवाराला १0 लाख रूपयाची मदत करणे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी समोर येऊन आमदार खासदारांना घेराव घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या रेल्वे मध्य रेल्वेला जोडा

0

गोंदिया : गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर व चंद्रपूर हे बिलासपूर झोनमध्ये आहेत. येथील लोकप्रतिनिधीना समस्या सोडविण्यासाठी बिलासपूर व छत्तीसगड येथे जावे लागते. या जिल्ह्यांना मुंबई मुख्यालय असलेल्या मध्य रेल्वेला जोडण्यात यावे, अशी मागणी डेली रेल्वे मूवर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल व विष्णू शर्मा यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना केली आहे.
विदर्भातील रेल्वे प्रवाशांसोबत बिलासपूर झोन भेदभाव करते. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे व दुर्गपासून ४0-४0 जोडी एक्सप्रेस दररोज सोडल्या जातात. रायपूर,कोरबा, रायगड, देवरा रोड येथून दररोज ६ ते १२जोड्या एक्सप्रेस सोडल्या जातात. हे सर्व स्टेशन छत्तीसगडमध्ये आहे. परंतु विदर्भात येणार्‍या चांदापोर्ट, वडसा, नागभिड, इतवारी, भंडारा, गोंदिया या स्टेशनवरून एकही एक्सप्रेस १५ वर्षापासून प्रस्तावित करण्यात आली नाही. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचा विकास होऊ शकला नाही. गोंदिया येथून महाराष्ट्र एक्सप्रेस व विदर्भ एक्सप्रेस सोडल्या जातात. परंतु या दोन्ही गाड्या बिलासपूर झोनच्या नाहीत. पंतप्रधानानी बिलासपूर-नागपूर सुपरफास्ट आतापर्यंत सुरू केली नाही. तिसरी रेल्वे लाईन आज ही छत्तीसगडमध्ये तयार करण्यात आली.

स्थायी समितीने फेटाळले मागील सभेचे ठराव व कार्यवृत्त

0

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी ‘झेप.पी.’ म्हणजे खर्‍या अर्थाने झोलबा पाटलाचा वाडा असल्याचा प्रत्यय समितीच्या सर्व सदस्यांना आला. सभा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मागील सभेतील ठराव व कार्यवृत्ताला मंजुरी देणे गरजेचे असते. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे सदस्यांना त्याची प्रतच उपलब्ध झाली नसल्याने सदस्यांनी ते मंजूर करण्यास ठाम नकार दिला.
सभेच्या पाच दिवसांपूर्वी मागील सभेत झालेल्या ठरावाचे कार्यवृत्त, अनुपालन अहवाल सदस्यांना देणे गरजेचे आहे. मात्र ६ ऑगस्टला झालेल्या सभेचा अहवाल देणे तर दूर, सभेची नोटीस सुद्धा दिली जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपच्या काही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रमेश अंबुले, सुरेश हर्षे यांनी हा विषय उचलला. त्यानंतर राकाँचे पक्षनेता गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर व इतर सदस्यांनीही या विषयावरून पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांना धारेवर धरले. शेवटी पुढील सभेपूर्वी कार्यवृत्त सदस्यांना देऊन पुढील सभेत ते मंजूर करण्याचे ठरले.
या बैठकीत जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने काहीतरी उपाययोजना आखावी अशी विनंती काही सदस्यांनी केली. त्यावर काय करता येईल यावर विचार करण्याचे ठरले.
राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी काही पदाधिकार्‍यांनी दाखविलेल्या विशेष इंटरेस्टवरून या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. आमगाव तालुक्यातील कट्टीपार ग्रामपंचायतमधील डिजीटल साहित्य खरेदी प्रकरणात हर्षे यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रत्यक्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवात त्यांच्यावरील आरोप निर्थक असल्याचे स्पष्ट झाल्याने यावरून शिक्षण सभापतींना विरोधी सदस्यांनी टार्गेट केले. यावेळी चौकशी अहवाल वाचून दाखवा अशी मागणी गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर यांनी केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांनी ग्रामसेवकाला नोटीस पाठविण्यासोबतच सात दिवसाच्या आत कट्टीपार ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले.