महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविणार- मुख्यमंत्री

0
9

मुंबई दि. १५:- राज्यातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडविण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजारोहण समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहित, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया, तिन्ही सेना दलाचे प्रमुख यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.