अपहरण केलेल्या तीन जणांची सुटका

0
10

वृत्तसंस्था 

रायपूर – छत्तीसगढमधील बस्तर येथून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या महाराष्ट्रातील तीन सायकलस्वरांची छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

राज्य राखीव पोलिस दलाचे बस्तर विभागाचे पोलिस महासंचालक कल्लूरी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “युवकांना सोडण्यात आले असून ते चिंतलपूर येथील पोलिस कॅम्पमध्ये पोचले आहेत‘ सुटका झालेल्या तीन सायकलस्वारांमध्ये आदर्श पाटील, विलास वाळके आणि श्रीरंग शेवाळे यांचा समावेश आहे. सायकलवरून शांतीचा संदेश देत जाताना या तिघांचे अपहरण करण्यात आले होते. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि ओडिशामधील नक्षलवादग्रस्त भागात शांतीचा संदेश देण्यासाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यातून सायकलवरून 20 डिसेंबर रोजी ‘भारत जोडो‘ मोहिमेस प्रारंभ केला होता.