पीएमजीएसवाय कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनाला अॅड. अणेंचा पाठिंबा

0
18

गोंदिया,(berartimes.com)दि.29-कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरेसह राज्यात यापुर्वी सुध्दा मृत्यूमुखी पडलेल्या अभियंत्याच्या घटनेनंतर राज्यातील सर्व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कंत्राटी अभियंत्यानी आपल्या नोकरीची पर्वा न करता सरकारच्या धोरणाविरोधात 25 आॅगस्टपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.हे आंदोलन 2 सप्टेंबरपर्यत राहणार आहे.त्यानंतर सरकारने मागण्या मंजुर झाल्या नाही तर 6 सप्टेबंरपासून नागपूरातील सविंधान चौकात बेमूदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
पीएमजीएसवायमधील अभियंत्यानी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी अॅटर्नी जनरल अॅड.श्रीहरी अणे यांनी तुमसर येथे आपल्या सभेकरीता आले असता समर्थन जाहिर केले.सरकारने दखल न घेतल्यास विदर्भ राज्य आघाडी सुध्दा 6 सप्टेबंरपासूनच्या आंदोलनात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी अभियंत्याच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवणार अशी ग्वाही पीएमजेएसवायच्या शिष्टमंडळाला दिली आहे.विदर्भ विकास आघाडीचे समन्वयक कमलेश भगतकर यांनी कंत्राटी अभियंत्याच्या समस्या जाणून घेऊन अॅड.श्रीहरी अणे यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.कंत्राटी अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत सोनवाने(पुणे),उपाध्यक्ष विकास डेकाटे(वर्धा),सचिव हर्षवर्धन पाटील तसेच वर्धेचे रोकडे,रत्नागिरीच्या चित्रा सावंत,नागपूरचे आशिष कराडे व संदेश बागडे,नंदुरबारचे पंकज विस्पुते,बीडचे विनोद जाधव,औरगांबादचे एस.आर.थडकर,पुण्याचे चंदु करंडे,चेतन शिंदे,भंडाराचे दिपक वैद्य,गडचिरोलीचे किरण नेमा,मुंगसे,अमरावतीचे अमित संघानी,यवतमाळचे अली,चंद्रपूरचे पाडेवार,गोंदिया अरविंद बिसेन,भुपेश तुरकर,राजेश येळे,मनोज काळे यांनी शासन स्पष्ट निर्णय जोपर्यंत घेत नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कळविले आहे.