राज्यातील २६७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

0
10

गोंदिया,दि.२१: पोलिस विभागाने राज्यातील २६७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, त्यात जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.काल रात्री महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम २२ न (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन पोलिस आस्थापना मंडळ क्रमांक २ ने कायद्याप्रमाण विहीत कालावधी पूर्ण केलेल्या नि:शस्त्र पोलिस निरीक्षकांच्या पदस्थापनेस मान्यता दिली आहे. बदली झालेल्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील ८, गडचिरोली जिल्ह्यातील 3, मुंबई शहरमधील २७, पुणे शहरमधील १३, ठाणे शहरमधील १०, नागपूर शहरमधील २, नाशिक शहरमधील ३, औरंगाबाद शहरमधील १ व अन्य प्रमुख ठिकाणच्या पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांची नवी मुंबई येथे पदस्थापना करण्यात आली आहे. चामोर्शीचे पोलिस निरीक्षक किरण अवचार यांची बदली सोलापूर ग्रामीणमध्ये करण्यात आली आहे, तर अहेरीचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांचे स्थानांतरण कोल्हापूरला करण्यात आले आहे.